Et Cetera

Beat-the-Heat…!

There is no denial of the fact that the temperature in the summer season is rising to unbearable levels day-by-day. This is one of the implications of the Global Warming phenomenon which is inevitable given to the rise in wants of humans for comfort and available resources to fulfil those.

Air conditioning cools air within a closed space by releasing the hot air in the outer atmosphere catalysing global warming which will keep rising the temperature; a vicious circle that cannot be broken without a conscious effort of compensating the harm any AC causes to the environment.

One way to do this is planting more and more trees, at least 50 trees for a one-ton AC. But that cannot be a practical solution as, who would govern it and how? Also, people who can shell out money for their comfort would readily pay additional cost to get away with any such ‘*condition’!

Seems to be a catch-22 situation, isn’t it? But creativity is a quality specific to humans that have helped them not only survive all the calamities but build the world that we see around and live in. So, if one cannot refuse or reduce, it must reuse, recycle, and repurpose the available resources.

Air-coolers are much cheaper than ACs and are less harmful to the environment. And given the period of max, say 4 afternoon hours for 2 months of scorching heat, getting a cooler on rent can make a huge difference and a system offering such a solution can be easily devised and deployed.

Any such arrangement of making coolers available on rent is going to have its challenges and implications. Firstly, it will require change in the mindset and, an ecosystem supporting it. But it could be manageable, inexpensive, and certainly less destructive being sustainable to an extent.

This is just an idea that needs deliberation to prolong the catastrophe that is imminent otherwise. But for those who are environment/cost-conscious but still want to claim their comfort and are ready to experiment, here’s an idea that can work for you if you have a table-fan and an icemaker.

Disclaimer: This is a DIY experiment [Jugaad] that needs care and caution, try it at your own risk!

By the way, do you know that ‘Jugaad’ has found a place on Wikipedia and also in the dictionary…?

All the best to Beat-the-heat!

Trivia: In old times, structures were built with natural elements like stone and wood. Use of cement, glass was zero/minimal which helped the natural air-conditioning. The proof of concept is any ancient Indian temple that is the shelter providing comfort naturally in all weather conditions.

Et Cetera

चेकमेट…!

ईडी-पीडा टळो म्हणून किनाऱ्याला लागली ‘आदर्श’ गलबते,
इंजिन पुढे सरकेना म्हणून वारसा चालवण्या ‘शाही’ खलबते.

घड्याळाचे काटे वेळेशी जुळवून घ्यायला नजर चुकवून धावले,
आणि रिकाम्या डायलची तुतारी करून साहेब भक्तांना पावले.

रिक्षावाले रिक्षा सोडून धनुष्यबाणासह विजयरथावर चढले,
उरलेले तिगडीवर ईमान ठेऊन मग उर फाटेस्तोवर लढले.

महाराष्ट्र धर्माची लटकती लक्तरे सगळ्याच गाव वेशीवर,
चोरांचा उफाळता उन्माद अन संन्यासी टांगले फाशीवर.

कसली मूल्ये अन कसली निष्ठा, सत्तातुराणां न भयं न लज्जा  
बांधिलकी मेल्याचे दुःख नाही, पण हा तर सभ्यतेचाच फज्जा.

‘अपवित्र: पवित्रो वा’ संस्कृती, ‘फोडा आणि झोडा’ नीती
यांच्या संकरातून फोफावलेली पथभ्रष्ट सत्ताशरण रीती

युगे लोटली तरी आजही आपण सारे किंकर्तव्यविमूढ़ अर्जुन
पाहतो नफ्फड लोक’सेवकां’चा तमाशा वेळ अन पैसे खर्चून

चौसष्ठ घरं फिरूनही समस्त कौरव राजाश्रयाने करती मजा,
हतवीर्य पांडवांच्या ‘लाभार्थी’ प्रजेला मात्र ‘चेकमेट’ची सजा.

निष्काम कर्माचे नव्हे, सुखदुःखे समे कृत्वा भाव मनी धरायचे,
लोकशाहीची बूज राखण्या जनार्दनाने कर्तव्य आपले करायचे.

संकर्षण कऱ्हाडे 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीने नियतीशी मांडलेला डाव चौसष्ठ घरं फिरून आज चौसष्ठाव्या महाराष्ट्र दिनी कसा उलटलाय याचे आपण साक्षीदार असलो तरी, महाराष्ट्र धर्म वाढवण्याची जबाबदारी ही आपलीच होती, राहील आणि आज महाराष्ट्राच्या या निर्नायकी अवस्थेत तर ती अगदीच निर्णायक ठरेल. तेव्हा, परिस्थिती कितीही विदारक असली आणि आशा कितीही अंधुक असली तरी, ‘वो सुबह कभी तो आयेगी…’ यावर (अंध)विश्वास ठेऊन लोकशाहीच्या महोत्सवातला आपला सहभाग नोंदवायला मतदानकेंद्रावर हजेरी लावणे हा आपला अधिकार आणि कर्तव्य तर आहेच पण प्राप्त परिस्थितीत तो खराखुरा, निष्कलंक आणि निरपेक्ष धर्म आहे, तो पाळू या.

‘माझ्या एका मताने असा काय मोठासा फरक पडणार आहे?’ आणि, ‘एकतर राजकारण हा काही माझ्या आवडीचा विषय नाही, मला त्यात शून्य इंटरेस्ट आहे. शिवाय उन्हाने काहिली होत असतानां खास रांग लावून निवडून द्यावे असले कुठले थोर समाजसेवक रिंगणात आहेत…!’ असा सर्टिफाईड मध्यमवर्गीय विचार करून मतदानाची सुटी एन्जॉय करायला लोणावळा (सरड्याची धाव…) गाठणारे महानुभाव, रात्री पानाच्या ठेल्यावर मघई किंवा फुलचंद बरोबर ‘महागाई’ चघळतांना आढळले तर त्यांना पार्थसारथ्याच्या, ‘तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’ या प्रश्नाचे उत्तर तयार ठेवायला लागेल; पानाबरोबर गिळून किंवा थुंकून टाकता येणार नाही!

तेंव्हा, विद्यार्थी चीटिंग करतात म्हणून पेपरच तपासायचे नाही असे ठरवले तर मात्र नक्की ‘निकाल’ लागेल… लोकशाहीचा!

(स)माजमाध्यमांसह सर्वत्र कार्यरत कामगारांना जागतिक कामगार दिनाच्या आणि
समस्त मराठी भाषिकांना महाराष्ट्र दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

शुभम भवतु !

PS: बाय द वे, आज मराठी ‘अभिजात भाषा दिन’ ही साजरा करतात म्हणे, ‘आय टोटली सपोर्ट इट, यू नो, मराठी मस्ट बी टॉट इन ऑल इंग्लिश मिडीयम अँड इव्हन इंटरनॅशनल स्कूल्स टू कीप मराठी अलाईव्ह!’ वन ऑफ माय मराठीभाषाभिमानी फ्रेंड वॉज जस्ट सेयिंग…

Et Cetera

Too Much ‘Intervention’…!

Premiered yesterday on YouTube, ‘Too Much Democracy’ is a must watch for every Indian who wants to understand, analyze, interpret and act on the facts with a conscientious and unbiased perspective and not get carried away with a propaganda presented by compromising the facts and taking too much cinematic liberty!

Varrun Sukhraj has made a commendable job to document this revolution that never become unconstitutional, been and remained true to its spirit and principle, never succumbed to any forces and disturbances including natural calamities and continued its ‘intervention’ to register success of another nonviolent movement in India and stands as an epitome of the belief that…

Freedom and Democracy is not just about choosing people or electing candidates; it is more about using strengths and rejecting anything that has malicious intentions backed by unprecedented power to force them through.

This Facts-based Documentary demystifying all the fake narratives has Constitution of India in its pulse and therefore this is a tribute to Dr. Babasaheb Ambedkar on his 133rd Birth Anniversary.

Even before joining the Constituent Assembly, Dr. Ambedkar was developing ideas of constitutional theory and democracy. For instance, in one of his famous works titled Annihilation of Caste (1936) he writes, “my ideal would be a society based on Liberty, Equality and fraternity, which is only another name for democracy. Democracy is not merely a form of Government. It is primarily a mode of associated living, of conjoint communicated experience. It is essentially an attitude of respect and reverence towards fellowmen.”

(A long and Constitutional) Way to go… (India!)

Jai Hind!
Et Cetera

आजीचं गाणं…!

लपतात पण लाजत नाहीत
चावतात पण दिसत नाहीत
चिरडावे तर सापडत नाहीत…
ढेकूण फार झालेत…

चिरडलेच तर वाढतात
आपलेच रक्त काढतात
सगळे कपडे फाडतात
ढेकूण फार झालेत…

पेस्ट कंट्रोलवाले येतात 
उपाय सारे करून जातात 
निलाजरे विषही पचवितात
ढेकूण फार झालेत…

परोपजीवी इकडून तिकडे वाहतात
आपला आकडा वाढवत राहतात
बारमाही पर्वणीत पवित्र नाहतात
ढेकूण फार झालेत

घरालाच चूड लावावी का?
आपलेच संचित जाळावे का?
संस्कृतीची जळमटं काढावी का?
ढेकूण फार झालेत…

झटकून सारी धूळभरली सीटं 
घासावी एकदा व्यवस्था नीट
विवेक बाणवावा धीट
ढेकूण फार झालेत… 

आमच्या आजीची काही आवडती बोलगाणी होती. कुणी लिहिली होती माहित नाही. आम्ही नातवंडांनी तिच्याच तोंडून ऐकली आणि आमच्या लक्षात राहिली तशी इतरांना ऐकवली. त्यात एक गाणे ती मोठ्या तन्मयतेने गात असे… ‘बाबा, ढेकणाने मजला पिसाळले…!’

आज, इतक्या वर्षांनंतरही ढेकणांच्या त्रासातून आपली पूर्णतः सुटका झालेली नाही याचे वैषम्य आणि आजीला होणारा त्रास जाणवल्याने हे लिहावेसे वाटले. याचा नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकींशी दुरान्वयानेही संबंध नाही आणि तो तसा भासला तर निव्वळ योगायोग समजावा…!

शुभम भवतु !

Et Cetera

आत्मविमोह…!

  • समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, नजरेला नजर न देणे.
  • दुसऱ्याकडे बघून स्मितहास्य न करणे.
  • भाषेचा विकास अतिशय विलंबाने वा अजिबात न होणे.
  • समोरच्याने बोललेलेच पुन्हा बोलणे.
  • स्वतःतच मग्न असणे.
  • अन्य व्यक्तींचे विचार, माहिती, भावना वेगळ्या असू शकतात हे माहीत नसणे.
  • मैत्री करता / टिकवता न येणे.
  • एकट्यानेच तोच- तोच खेळ खेळत राहणे.
  • परिस्थितीत बदल झाल्यास अस्वस्थ होणे.
  • एखादी गोष्ट पसंत नसल्यास रडून गोंधळ घालणे.
  • एकाच गोष्टीत नको इतका रस दाखविणे. 
  • सामान्य ज्ञान कमालीचे तोकडे असणे.
  • अतिक्रियाशील वा अतिमंद असणे.

कृपया गैरसमज नसावा. एका अभ्यास अहवालाच्या कामासंदर्भांत सापडलेली ‘ऑटिजम’ अर्थात स्वमग्नता, आत्मविमोह या मानसिक स्थितीच्या काही लक्षणांची ही सूची. सांप्रत काळी आजूबाजूला आढळणाऱ्या बहुतांश मनुष्यप्राण्यांत ही लक्षणे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, त्याला कुठलाही वेगळा संदर्भ जोडू नये अथवा स्मार्टफोन, (स)माजमाध्यमे, सामाजिक/ राजकीय परिस्थिती यांच्याशी त्याचा संबंध शोधू नये ही कळकळीची विनंती!

शुभम भवतु !

Et Cetera

Prompt…!

“One of the things that is of great concern is AI and a lot of people are objecting to the fact that all of us are now being subjected to face mapping…”

“…There will be a time when Symbiosis will call my AI and not me personally,” said Amitabh Bachchan who was speaking at the inaugural function of the two-day independent film festival at the Symbiosis International University campus at Lavale, Pune.

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/107195602.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In a different context and responding to another situation involving AI, following is my take on AI…

  • I think being on the receiving side of the AI tool, we should be more equipped for Prompt Engineering and need to develop our skills for asking the right questions with a right context and in a right tone as the machines have become smart enough to understand the tone also.
  • It is easy for AI to process the query with all the Artificial Intelligence put into it, but we need to retain (and develop) our natural intelligence for striking the right chords and pushing the right buttons if we want to make the most of it.
  • Finally, a blade can be used to cut but whether to put it in a knife or a scalpel is completely up to the conscience (which is still a human monopoly) and not just intelligence. So, it is alright not to be conscious or scared of AI but at the same time, we must be cautious and concerned about its implications as well.

I am not against technological development or anything, only thing is I wholeheartedly believe that it is never about the tool but the mind and intention behind it that matters. Spears and javelins were originally invented for hunting the prey but soon became the weapons of war between the human troops. If Homo Sapiens were smart enough to use the weapon for their personal aspirations, it is scary even to imagine what a techno-savvy developed brain could make it to serve its monstrous ambitions!

It is more important to raise the collective EQ of the society before exposing it to the unprecedented powers. Humans could continue to exist only when any kind of power is balanced with equal amount of empathy!

Way to go…!

Et Cetera

पर्पल…!

ती लहान असतांना,
एकुलत्या एक लेकीच्या 
वेण्या घालायचो तेंव्हा 
ती विचारायची, 
‘डॅडू, तू कुठे शिकलास वेणी घालायला…?’

https://www.facebook.com/share/p/g5GbTWNU8sCg3ATh/?mibextid=xfxF2i

कितीही गुरु केले तरी 
कित्येक प्रश्नांना उत्तरं नसतातच !
की आपण पुरेसा शोध घेत नाही,
म्हणून सापडत नाही !
हाही एक निरुत्तर,
प्रश्नच…!

https://www.facebook.com/purplefestgoa/

Et Cetera

लोकतंत्र…!

“आदरणीय अध्यक्ष, मैं ४० वर्षों से संसद में हूं… मैंने सरकारें बनती और गिरती देखी हैं… लेकिन भारत का लोकतंत्र ऐसे सभी क्षणों से मजबूत होकर उभरा है।”

“आज, मुझ पर सत्ता की लालसा और सत्ता में रहने के लिए कुछ भी करने का आरोप लगाया गया है… लेकिन, मैं पहले भी सत्ता में रहा हूं और मैंने सत्ता के लिए कभी कुछ अनैतिक नहीं किया। अगर सत्ता में बने रहने के लिए गठबंधन बनाने का एकमात्र तरीका राजनीतिक समानता को तोड़ना है, तो मैं ऐसे गठबंधन को चिमटेसेभी छूना नहीं चाहता।”

“हम मजबूत गठबंधन के सामने झुकते हैं… लेकिन निश्चिंत रहें कि जब तक हम देशहित में जो काम शुरू नहीं कर देते, उसे पूरा नहीं कर लेंगे, तब तक चैन से नहीं बैठेंगे”

“आप देश चलाना चाहते हैं, यह अच्छी बात है। आपको मेरी शुभकामनाएं हैं। हम देश की सेवा में काम करना जारी रखेंगे। हम मजबूत गठबंधन के सामने झुकते हैं और आपको आश्वासन देते हैं कि जब तक हम इसे पूरा नहीं कर लेते, हम आराम से नहीं बैठेंगे।”


आज अटलजींच्या ९९ व्या जयंतीनिमित्त त्यांचे अत्यंत प्रेरणादायी आणि तितकेच पथदर्शी असे हे ऐतिहासिक भाषण आणि या तीन कविता… हे सगळे ऐकता, वाचता, पाहता संवेदनशील विचारी ‘मना’ला, देशाला आज अटलजींची कधी नव्हती एव्हढी गरज असल्याचे जाणवावे… 

सुशासन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

जय हिंद !


कौरव कौन, कौन पांडव

कौरव कौन
कौन पांडव,
टेढ़ा सवाल है।
दोनों ओर शकुनि
का फैला
कूटजाल है।
धर्मराज ने छोड़ी नहीं
जुए की लत है।
हर पंचायत में
पांचाली
अपमानित है।
बिना कृष्ण के
आज
महाभारत होना है,
कोई राजा बने,

रंक को तो रोना है।

दूध में दरार पड़ गई

खून क्यों सफेद हो गया?
भेद में अभेद खो गया.
बंट गये शहीद, गीत कट गए,
कलेजे में कटार दड़ गई.
दूध में दरार पड़ गई.

खेतों मे बारूदी गंध,
टूट गये नानक के छंद
सतलुज सहम उठी, व्यथित सी बितस्ता है.
वसंत से बहार झड़ गई
दूध में दरार पड़ गई.

अपनी ही छाया से बैर,
गले लगने लगे हैं ग़ैर,
ख़ुदकुशी का रास्ता, तुम्हें वतन का वास्ता.
बात बनाएं, बिगड़ गई.
दूध में दरार पड़ गई.

राह कौन सी जाऊँ मैं?

चौराहे पर लुटता चीर
प्यादे से पिट गया वजीर
चलूँ आखिरी चाल कि बाजी छोड़ विरक्ति सजाऊँ?
राह कौन सी जाऊँ मैं?

सपना जन्मा और मर गया
मधु ऋतु में ही बाग झर गया
तिनके टूटे हुये बटोरूँ या नवसृष्टि सजाऊँ मैं?
राह कौन सी जाऊँ मैं?

दो दिन मिले उधार में
घाटों के व्यापार में
क्षण-क्षण का हिसाब लूँ या निधि शेष लुटाऊँ मैं?
राह कौन सी जाऊँ मैं ?

Et Cetera

डीप-फेक…!

बाजारशरण बुद्धिमत्ता आणि विवेकहीन विचारशून्यता
यांच्या पोषणासाठी नित्य कार्यरत असणारी सर्वभक्षी व्यवस्था…

केवळ आपल्या सोयीच्याच गोष्टी दाखवणारी, भासवणारी, ऐकवणारी
आणि बिंबविणारी सर्वशक्तीमान, सर्वसाक्षी स्वमग्न अवस्था…

यांच्या अभद्र युतीने काळवंडलेले मानव्य ज्याचा आशेवर तरावे
त्या शिक्षणाची अक्षम्य हेळसांड आणि त्यालाही बाजारू करणारी…

‘नातिचरामी’शिवायच आपल्या नावाचा मळवट भरायला लावणारी
सीएसआरच्या नावाने चांगभलं करणारी ‘लिव्ह-इन’ची मिरासदारी…

या जगङ्‌व्याळ घातचक्राचे धोरणी प्रयोजन आणि शास्त्रशुद्ध नियोजन करणाऱ्या
धुरीणांच्या जन्मजात स्वयंप्रज्ञेला ‘डीप-फेक तंत्राची काय गरज अन कसली तमा?’

असा प्रश्न चाटजीपीटीला विचारला तर त्याची कृत्रिम बुद्धिमत्ता हँग झाली आणि…
मशीन म्हणाले… ‘एक्सक्यूज मी, बट आय अम स्टील लर्निंग… डीप लर्निंग !’




.  

.
.
.
फार डीप झाले का हे…
…की अगदीच फेक…?

Et Cetera

Star…!

https://stellar-registry.org/?star_id=3071880

With due respect and deep gratitude for Shri. Gajanan Madhav Joshi (Presently residing at Australia) for his gesture of love, gratitude and reverence for our most beloved and adored teacher Shri Dabke Sir, who will always remain the epitome of developing Scientific temper in children; being honest to that very scientific temper “that is ever ready to welcome new light, new knowledge, new experiments, even when their results are unfavorable to preconceived opinions and long-cherished theories”, please allow me to clarify a message being viral about a star being named after Dabke Sir by NASA which is not only half-truth but also completely misguiding as spreading such type of messages without verifying the facts amounts to propaganda for deceptive purposes.

We, as the citizen of the largest democracy and students of New City High School, Dhule and Dabke Sir, should refrain from any such act and please do not spread any such news that will not only demean but will also discredit our upbringing as it will defeat the very purpose of evolution, education and development.

No matter what, Dabke Sir was, is and will always be Extra-Bright Shining Star for all his students, with or without any glorification whatsoever. We love and respect you, SIR!

Et Cetera

सज्ज…!

वैफल्यग्रस्त ‘मना’ला टोचते…

ग्लॅमरने केलेली सृजनाची मुस्कटदाबी,
मार्केटच्या पायात गोंडा घोळणारे ग्लॅमर…
प्राचीन मानवी संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगणारी अर्वाचीन द्वेषपेरणी
भग्न माणुसकीचा नग्न तमाशा आणि लोकशाहीचे समारंभपूर्वक वस्त्रहरण…!
नफ्फड राजकारण्यांच्या वळचणीला राहणारे भोंदू समाजकारणी,
विचारावर विकाराचा पगडा आणि विवेकक्षयामुळे एकांगी विकासाचे खचलेले संतुलन…!

‘सारंच अवघड झालंय…’,
‘गोष्टी हाताबाहेर गेल्यात…’,
असे वाटू लागले की,
अचानक एक दिवस उगवते…
निर्मम, निर्गुण, निरपेक्ष आणि… निरुपयोगी… कावळ्याची छत्री…!
निसर्गाचे ‘मना’ला आश्वस्त करण्याचे सूक्ष्मातले विश्वरुप…

आणि मग ‘त्याची’ आठवण दाटून येते… ‘मना’ला उभारी देते!
खांद्यावर हात ठेवून, ‘अशी हार मानून चालत नसते. उठ, लढ!’ म्हणते…
की, ‘मना’ सज्जना सज्ज…

पुन्हा लढायला !

Et Cetera

आख्यान…! 

विनासायास सुखासीन झालेल्या लाभार्थ्यांनी
पापाचे वाटेकरी होण्यास साफ नकार दिल्यावर
नरकद्वाराचे भय अन स्वर्गारोहणाच्या आमिषाने
वाल्याचा वाल्मिकी करणाऱ्या सहज योजनेची
अखंड नामजप मंत्ररुपी कळ लीलया फिरवणाऱ्या
स्वामीनिष्ठ ठेकेदारांची नीतिमत्ता आणि
स्वत्वासाठी जपलेला बाणेदारपणा

तथा…

हातून घडलेल्या चुकीची शिक्षा म्हणून मिळू शकणाऱ्या
शापाला घाबरून पापाचे परिमार्जन करण्यासाठी
आपापल्या सत्वपरीक्षेने साध्य न होऊ शकणारे फळ
पातिव्रत्याचे सत्व पणास लावून मिळवू पाहणाऱ्या वीरांना
तिच्या क्षणिक भाळण्याचे लांच्छन वाटून घेणारी
सत्वगुणी राजपुत्रांची न्यायप्रियता आणि
दैवी मायेच्या उपयोगीतेचा भावार्थ…

…एवढाच आपल्या संस्कृतीचा अर्क

आणि

‘जाणता राजा’च्या आणि
‘भाई’च्या बड्डे सेलिब्रेशनमध्ये
फरक करता न येणे
हा आपल्या परंपरेचा तर्क असेल

तर…

संदर्भ मुळापासून तपासायला नकोत…?

Et Cetera

झिम्म…!

अवचित सर पावसाची
मातीत जिरून गेली
अन् मिजास अत्तरांची
क्षणात विरून गेली…!

पाण्यात मिसळता रंग
मन मोरपीस झाले 
उन्मेष मनी लपलेले
सहजी बहरून आले…!

हीन भावनांचे पोत
विरता विषाद नुरले
मुग्ध रेशमी स्पर्शाने  
झिम्म देहभान थरथरले…!

Et Cetera

II शिवकल्याणराजा II

निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू
श्रीमंत योगी II

नरपति हयपति गजपति
गडपति भूपति जळपति
पुरंदर आणि शक्ति
पृष्ठभागी II

यशवंत कीर्तिवंत
सामर्थ्यवंत वरदवंत
पुण्यवंत नीतिवंत
जाणता राजा II

आचारशील विचारशील
दानशील धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील
सकळा ठायीं II

धीर उदार गंभीर
शूर क्रियेसि तत्पर
सावधपणे नृपवर
तुच्छ केले II

देव धर्म गोब्राह्मण
करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण
प्रेरणा केली II

या भूमंडळाचे ठायी
धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही
तुम्हा कारणे II

कित्येक दुष्ट संहारिला
कित्येकांसि धाक सुटला
कित्येकांस आश्रयो जाहला
शिवकल्याणराजा II

– संतश्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी 

Et Cetera

Reminder…!

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN, SOCIALIST, SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:
JUSTICE, social, economic and political;
LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;
EQUALITY of status and of opportunity; and to promote among them all
FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation;
IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

INDEPENDENCE is the BIRTHRIGHT
DEMOCRACY is the RESPONSIBILITY
And CONSTITUTION is the CONDUCT…!

Let Us RESPECT our INTEGRITY Responsibly…

WE have PLEDGED for it on this day, 74 Years Ago…!

Just a reminder…

Jai Hind!

Et Cetera

संक्रमण…!

समूहाचा समाज होऊन माणूस सौहार्द्र आणि संस्कृती जोपासू लागला तेव्हापासून काही चालीरितींचा परिपाठ सुरु झाला असावा. निसर्गनियमांना अनुसरुन विशिष्ट ऋतूच्या हवामानानुसार काही सण-समारंभ-उत्सव यांचे प्रयोजन केले जात असावे. माणसाला प्राथमिक गरजांपलीकडचा व्यवहार आणि भावना यांची ओळख झाल्यांनतर, परस्परावलंबनाची गरज आणि पर्यायाने परस्परसंबंधाची उपयुक्तता जाणवल्याने ज्या मानवी संबंध विषयक परंपरा प्रचलित झाल्या असाव्या त्यातूनच ‘थँक्स गिव्हिंग’, ‘पर्युषण पर्व’, ‘मकर संक्रांती’ अशी औचित्ये तयार झाली असावी. थंडीचा सामना करण्यासाठी शरीरात उष्णता निर्माण करणारे तिळगूळ या शास्त्रीय कारणाला, मकर संक्रमणाने नव्या पर्वाची सुरवात होण्याच्या मुहूर्तावर राग-लोभ, भेद-द्वेष विसरून, ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी…’ म्हणत नवी सुरवात करायची म्हणून, गोड बोलण्याचा प्रेमळ आग्रहाची भावनिक वेलबुट्टी अशी मूळ कल्पना असावी. 

आज मात्र या सदिच्छेचा क्रम बदलून ‘गोड गोड बोला आणि तिळगूळ मिळवा’ असा उलटा झालेला दिसतो. सगळीकडे गोड बोलण्याची इतकी स्पर्धा आहे की साखरेला भाव का नाही याचे कोडे पडावे. बारा महिने साखरपेरणी अशी होतांना दिसते की मुंगी होऊन साखर खाण्याच्या अहमहिकेत मुंग्या खरंच मेरू पर्वत गिळतील की काय अशी शंका यावी. पूर्वी सरंजामशाहीत एक राजा, अष्टप्रधान मंडळ, काही खुषमस्करे आणि खूपशी खुशहाल(?) प्रजा अशी सर्वसाधारण रचना असे. आज आधुनिक लोकशाहीत एक राजा, त्याचे काही इमानी सेवक, बहुसंख्य खुषमस्करे आणि नेमक्या कुठल्या ‘मंडली’त सामील व्हावे म्हणजे नॉमिनेशन, पर्यायाने एलिमिनेशन पासून वाचता येईल आणि मिळेल त्या ‘प्राईज मनी’सह ट्रॉफी पटकवता येईल या विचारात ‘बिग बॉस’च्या सेवेत अहोरात्र झटणारी प्रजा असे चित्र दिसते.

हे चांगले आहे कि वाईट आहे याबद्दल मते मतांतरे असू शकतात. कुणाला ही ‘काळाची गरज’ वाटू शकते, कुणाला हे कुटुंबासाठीचे ‘सामाजिक कर्तव्य’ वाटू शकते, कुणाला ही अस्मितेसाठीची ‘राष्ट्रीय जबाबदारी’ वाटू शकते तर कुणाला हा संविधानप्रणीत ‘जन्मसिद्ध अधिकार’ वाटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ते काहीही असले तरी विषाद वाटतो तो एकाच गोष्टीचा – म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. शिवाय, रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचा शरीराच्या इतर संस्थांवर परीणाम होऊन डोळे, धमन्या, किडनी, रक्तवाहिन्या असे अत्यंत महत्वाचे अवयव निकामी होण्याचा धोका असतो हे शास्त्रीय सत्य ‘डायबेटीस’ या बागुलबुवाच्या रूपाने भेडसावत असतेच.

तेंव्हा काही कालबाह्य झालेल्या पारंपारिक रीती-रिवाजांचा पुनर्विचार करून, नवयुगाच्या नवीन संदर्भात त्यांची फेररचना करावी असे वाटते. त्यामुळे ‘…गोड गोड बोला…’ ऐवजी, ‘खरं खरं आणि स्पष्ट बोला…’ असे पोटतिडकीने म्हणावेसे वाटते. आणि हा स्पष्टवक्तेपणा फारच अंगाशी येईल अशी भीती असेल तर पळवाट म्हणून, अलीकडे सगळेच जसे ‘कॉमेडी विथ कपिल’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नावाने हसून साजरे करायचे असते, तसा एक प्रसंगोत्पात पुणेरी ज्योक आहेच दिमतीला… 

चायनीज खाऊन कुठं लोक चायनिज बोलतात का ?
मग…? तिळगुळ खाऊन गोड कसे बोलणार…?
– एक पुणेरी शंका   
  

बरं, गोड बोलण्याचं राहू  दे, पण मकर संक्रमणाने सुरु झालेल्या तेजोपर्वाच्या ‘मना’पासून शुभेच्छा… !

शुभम भवतु…!   

Et Cetera

गांधारी…?

द्रौपदीने किंकर्तव्यविमूढ़ अशा
पांडवालाच का वरायचं…?
आणि पाच पाच स्वामी असतां
कृष्णालाच का स्मरायचं…?

कृष्णनीती म्हणून त्याने कुटील आणि
अकर्मी विदुराने सूज्ञ ठरायचं…?
रोज विवेकाने लढाया जिंकून अंती
मायेसाठी पाणी भरायचं…?

धर्मयुद्धात जिंकूनही नेहमीच
कर्माने का हरायचं…?
आणि रणवीर असून दानशूरतेचं
ओझं कर्णाने मस्तकी धरायचं…?

धर्म उचलून धरण्यासाठी हकनाक
अश्वत्थाम्याने का मरायचं…?
आणि धृतराष्ट्राचं अंधत्व समजलं,
पण गांधारीचं काय करायचं…?

Et Cetera

Festival of Light…!

We live in interesting times and in an amazing country that is unique for many reasons. For example, take the name and you won’t find any other country in the world having 3 historical, official and validated names. You are a modern Indian living in ancient Bharat as a proud Hindustani, aren’t you?

But that variety should be our strength and no one should be able to divide us on the grounds of our diversity. The only way we can do it is by Hindustan walking in its stride with a vision of Bharat taking India on its shoulders to see farther. We must proclaim our developed status but not before making sure that no one is left behind. Because the distinction in our minds between urban India, rural Bharat and a literary Hindustan transforms into our transactions impeding our unanimity as a nation.

जलाओ दिये पर रहे ध्यान इतना
अँधेरा धरा पर कहीं रह न जाए…

किसीके अंधेरे मिटा दो, 
किसीके सपने सजा दो,
दिलमें जगह बना लो,
अपने दुनियामें समा लो…

At the Indian Institute of Technology, Hyderabad, Dr. APJ Abdul Kalam gave one of his finest speeches, where he articulated his visions for India. An excerpt from it reads,

I was in Hyderabad giving this lecture, when a 14 year old girl asked me for my autograph. I asked her what her goal in life is: She replied: “I want to live in a developed India.” For her, you, and I will have to build this developed India.’

A teenager sharing her profound vision for her country with the most powerful and most adored People’s President of India should make us feel as proud as responsible…!

Let us try and bridge that gap as our Rational Social Conscience and Collective National Responsibility

Celebrate Diwali and let there be light… within also!

Et Cetera

अमिट…!

कुठलेही 
धनाढ्य ‘हित’चिंतक,
नेमस्त अंधभक्त,
बाजारू माध्यमे, अथवा
उथळ (स)माज माध्यमे
यांच्याशिवाय…

फक्त दुर्दम्य आशावाद, 
उत्स्फूर्त जनाधार, संघटन कौशल्य
आणि नैतिक सामर्थ्याच्या जोरावर 
एक देशव्यापी चळवळ उभारून
एका उन्मत्त आणि बलाढ्य सत्तेला
आव्हान देऊन हादरवणारी घटना
केवळ ८० वर्षांपूर्वी याच भूमीत घडली…
 
ही दंतकथाच वाटावी अशी
आजची परिस्थिती बघितल्यावर,
गेल्या शतकातील सर्वात विद्वान माणसाने
या माणसाबाबत केलेले भाकित
किती ‘शास्त्रोक्त’ होते हे पटते…

“…असा, आपल्यासारखाच
हाडामासाचा जिवंत माणूस 
या भूमीत खरोखरच वावरला होता 
यावर विश्वास ठेवणे
येणाऱ्या पिढ्यांना अवघड जाईल…”


…आणि तसा विश्वास तयारच होऊ नये 
अथवा शिल्लक राहू नये यासाठी
करण्यात आलेल्या सर्व 
कडोनिकडीच्या प्रयत्नांना 
हा माणूस कायम पुरुन उरला…
उरतो…
उरेल…!

Et Cetera

Trusteeship…

“संपत्ति की विषमता कृत्रिम व्यवस्था के कारण पैदा हुई है, ऐसा मानकर उसे छोड़ भी दें, तो मनुष्य की शारीरिक और बौद्धिक शक्ति की विषमता पूरी तरह दूर नहीं हो सकती। शिक्षण और नियमन से यह विषमता कुछ अंश तक कम की जा सकती। किंतु आदर्श की स्थिति में इस विषमता के सर्वथा अभाव की कल्पना नहीं की जा सकती। इसलिए शरीर, बुद्धि और संपत्ति इन तीनों में से जो जिसे प्राप्त हो, उसे यही समझना चाहिए कि वह सबके हित के लिए ही मिली है। यही ट्रस्टशिप का भाव है। अपनी शक्ति और संपत्ति का ट्रस्टी के नाते ही मनुष्यमात्र के हित के लिए प्रयोग करना चाहिए। ट्रस्टीशिप में अपरिग्रह की भावना निहित है।“

Even if we consider that the inequality of wealth has arisen due to artificial system and leave it still, the inequality of physical and intellectual power of man cannot be completely removed. This disparity can be reduced to some extent by education and regulation. However, complete absence of the inequality in an ideal situation, cannot be imagined. Therefore, whoever has physical strength, intellectual power or abundance of wealth should appreciate that it has been bestowed on him for the benefit of all. This is the spirit of trusteeship. As a trustee, the power and property should be used for the benefit of mankind. There is a sense of non-possession in trusteeship.

Remembering First Modern Saint of India Aacharya Vinoba Bhave on his Birth Anniversary…

Jai Jagat!

Read Geetai here

Et Cetera

ओक्के मध्ये हाय…!

कोण नेता कोण अभिनेता कोण खलनायक

कोण भाडोत्री कोण दलाल कोण मालक

कोण प्रवासी कोण वाहक कोण चालक

कोण येतो कोण जातो कोण राहतो

कोण सांगतो कोण एकतो कोण पाहतो

कोण भरतो कोण उपसतो कोण नाहतो

कोण साधा कोण सोज्वळ कोण अनाडी

कोण सराईत कोण अट्टल कोण खिलाडी

कोण आगाडी कोण मधला कोण पिछाडी

कोण मूर्ख कोण मंद कोण हुश्शार

कोण कच्चा कोण पक्का कोण तय्यार

कोण पारधी कोण सावज कोण हत्यार

कोण साधा कोण सरळ कोण हिकमती

कोण नागपूर कोण मुबई कोण बारामती

कोण उथळ कोण बोलभांड कोण करामती

कोण रक्षक कोण भक्षक कोण हाकारे

कोण मतलई कोण खारे कोण न्यारे

कोण मी कोण तू कोण हे सारे…?

Et Cetera

#Metaverse…!

First it offered me ability to talk (and listen) to dear-but-not-near ones…

Then it helped me to use it from any room with its extended capacities…
Moving on, it cut off the cord and freed me to move around while talking…

Eventually it became hand-held to replace all my accessories like –
– Watch
– Calculator
– Calendar
– Notepad
– Organizer
– Map
– Computer
– Wallet
– Keys

Also, it helped me get rid of long queues for virtually anything out there.

It takes care of my infotainment as well as well-being with its organized approach.

It suggests me
– where to go with
– what means of transport,
– which route would be better,
– what to wear,
– what to eat,
– what to see,
– what to read,
– what and how should I feel,
– how and with whom to sleep…
all with the help of its Artificial Intelligence that knows everything about me and… ‘my’ choices…?

It has not only made me ‘mobile’ as I can be on the move always, but it has also made me care-free and thoughtless as it takes all the decisions for me and saves my energy that is meant to be preserved and utilized for running the race which increases our PPP…

And if I choose to be more independent and follow my own heart using my own rationale, you ask? Then I would be suffering from FOMO – the deadliest and almost incurable disease humans have ever discovered… or invented?

Now, it has not only made it impossible to talk to dear-but-not-near ones but also disabled talking to near-and-dear-ones as no one wants to miss anything that is happening in the #metaverse which can be liked, shared, tagged or commented on… Nothing @universe can match it, you know!

Ah! And now I can move around to talk, to shop, to show-off and to get used by… My-Phone!

She is not a Celebrity and those are not Paparazzi…
Just Affectionate Appreciation of Awesome Achievements…!

PS: My daughter bought a New High-end Smartphone – First with her own earnings… Something to be proud of for sure… and an opportunity to reflect on its evolution, hoping everybody realizes that it’s just a gadget to be used for two-way communication with mutual agreement and not the other way round… Way to go!

Amen!

Et Cetera

अलौकिक…!

ही माणसं वेगळीच असतात. म्हणजे जगावेगळीच. यांच्या धर्म-अर्थ-काम-मोक्ष या पुरुषार्थाच्या संकल्पना निराळ्याच असतात. यांच्या कल्पनाशक्तीला दाद दयावी, यांच्या उपक्रमांना सलाम करावा की यांच्या झोकून देऊन नि:स्वार्थ कार्यमग्नतेने प्रेरित व्हावे काहीच समजत नाही.

अगदी पहिल्या वाढदिवसापासून पन्नाशी, साठी, पंचाहत्तरी ते सहस्त्रचंद्रदर्शन असे अनेक समारंभपूर्वक सोहळे आपण पाहिले असतील, आयोजित केले असतील आणि कधी कधी स्वत: अनुभवले देखील असतील. पण असे अनवट वाढदिवस साजरे करण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

यातील पहिले, शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते आमचे लाडके ‘मेजर’! हा माणूस अफाट आहेच. याने आजवर मनुष्यासह अनेक प्राण्यांचे जीव वाचवले आहेत आणि अगदी जंगली प्राण्यांचीही जीवघेण्या परिस्थितीतून सुटका केली आहे, इथवर जाणून होतो आणि ठीकही होते.

यावेळी मात्र या माणसाने ४५वा वाढदिवस साजरा करायला असा उपक्रम हाती घेतला (आणि यशस्वी केला हे ओघानेच आले!) की आता या कायम उत्साहाने सळसळणाऱ्या युवकाने थेट ‘मांझी द माउंटन मॅन‘ची आठवण करून दिली. तपशीलासाठी वाचा पुणे सकाळने घेतलेली या कामगिरीची दखल…

या रेकॉर्डसाठी या कामगिरीचे इंग्रजीत शब्दांकन करण्याचे भाग्य लाभले एवढेच आमचे यातील योगदान !

दुसरे केवळ अशक्य गृहस्थ म्हणजे डॉक्टर अभिजित सोनवणे – डॉक्टर फॉर बेगर्स – भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर. हा माणूस जे काम करतो ते तर अलौकिक आहेच पण एवढे अवघड, दमणूकीचे काम करून या माणसाला त्याबद्दल एवढे तपशीलवार लिहिण्याची उर्जा कुठून मिळते हे तर कायमचे कुतूहल आहे.

परवा १७ एप्रिलला या अवलीयाचा वाढदिवस झाला तो त्याने कसा साजरा केला वाचा त्याच्याच शब्दात…

Happy Birthday अभ्या तुला…

@doctorforbeggars

…आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही सत्कारणी लावण्याची त्याची धडपड आपलं माणूस… !!! मध्ये जरूर वाचा आणि यथाशक्ती योगदान द्या… आणखी कुणाचा तरी वाढदिवस शुभंकर करण्यासाठी!

एवढे तरी आपण नक्कीच करू शकू… नाही का?

शुभम भवतु !

Et Cetera

हितगुज…?

पूर्वी लोक पत्र लिहीत असत, पत्र म्हणजे अर्धी भेट मानत. आम्ही अजूनही लिहितो अधून मधून, खूपच उचंबळून आलं की. खूप भरून आलं की भरभरून व्यक्त व्हायला लागतं. तिथे हे मेसेज वगैरे अगदीच बिनकामाचे आणि ते व्हॉटसअॅप वगैरे तर फारच कुचकामी. एकतर खूप सारं बोलायला लागतं किंवा लिहायला तरी, तेव्हाच मोकळं वाटतं. पण मुद्दा तो नाही, मुद्दा आहे पत्र. पत्र हा लेखनप्रकार साहित्यात मोडत नसला तरी समाजमनाच्या जडणघडणीत आपली जागा (आणि आब) राखून आहे. अगदी अब्राहम लिंकनच्या ‘हेडमास्तरांना पत्र‘ पासून थेट माहेरवाशिण बायकोने पुलंच्या ‘असामी’ला धाडलेले छत्रपतींच्या आज्ञापत्राच्या धाटणीचे सूचनापत्र अशी ऐतिहासिक, भावनिक तथा व्यावहारिक परंपरा लाभलेल्या या पत्रलेखनाबद्दल शालेय पाठयक्रमात ‘स्वाध्याय’ नसता तरच नवल.

शाळा सोडतांना शाळा सोडल्याच्या दाखल्याबरोबर स्वाध्यायासह इतरही अनेक गैरसोयीच्या गोष्टी शाळेतच सोडण्याची देखील एक ‘विकसनशील’ परंपरा आहे. जणू काही या गोष्टी आपण आयुष्यभर सोबतीसाठी बरोबर घेतल्या तर शाळेत येणाऱ्या पुढच्या पिढयांची त्यांच्यावाचून आबाळच होईल ! यातील शाळेबरोबरच सोडायच्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे – स्वयंशिस्त आणि नागरिकशास्त्र – मुळात दोन्ही ‘स्कोअरिंग सब्जेक्ट्स’ नसल्याने आधीपासूनच ऑप्शनला टाकायची सोय असते अन त्यांची वकिली करायला कुठलेच कोचिंग क्लासेस पुढे येत नसल्याने बिचारे अजूनच अडगळीत पडतात. खरे तर एवढे दोनच विषय नीट समजले आणि अंगी बाणवता आले तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर जगातील काहीही शिकणे शक्य व्हावे. पण लक्षात कोण घेतो?

आम्ही केवळ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची पूर्वअट म्हणून शाळा सोडल्याचा दाखला घेतला, अन्यथा आम्ही आजही मनाने शाळेतच आहोत. यालाच बहुतेक ओल्ड स्कूल मानसिकता म्हणत असावे का? असो. तर त्यामुळे आमच्या पत्रलेखनात चार गोष्टी कालत्रयी बदलल्या नाहीत, अगदी दर २४ तासाला स्टेट्स (पूर्वी हे कमवायला आयुष्य खपवावे लागत असे, म्हणे !) बदलण्याच्या काळातही ! पहिली गोष्ट पानाच्या सर्वात वरती मधोमध II श्री II अशी प्राणप्रतिष्ठा, त्याखाली उजव्या कोपऱ्यात वार व दिनांक, मग डावीकडे समास सोडून मायना आणि सर्वात खाली समारोप करतांना ‘कळावे, लोभ असावा.’ या शेवटच्या तीन शब्दात जे सौहार्द्र सामावले आहे त्यात मानवी संबंधांचे जितके आयाम आहेत तेवढे कुठल्याही अतिप्रगत सोशल नेटवर्कमध्येही सापडणे शक्य नाही. 

यातील ‘लोभ’ (हा मोह-मायेशी संबंधीत ‘हव्यास’ अशा अर्थाचा नसून, मायेच्या आत्मीयता, ममत्व या स्वरुपाचा आहे !) असावा’मध्ये जेवढी मायेची ऊब तेवढाच प्रेमळ अधिकार आणि नात्याची वीण घट्ट ठेवण्याच्या ग्वाहीबरोबर अपेक्षाही, पण ‘कळावे’ मध्ये याहून अधिक बरेच काही…! त्यातील सगळ्यात महत्वाचे म्हणजे निरंतर संवादण्याची आस्था, आपुलकी आणि आग्रह ! केवळ ख्याली-खुशाली किंवा फक्त सुखवार्ताच कळावी म्हणून नाही तर सारेच समाचार समजावे, म्हणून ‘कळावे’ ! मुळात आप्त-स्वकीय स्वजन यांना आपल्या सुख-दु:खात सहभागी करून घेण्यातील समानुभूतीचा उद्गार म्हणजे ‘कळावे’ ! तोरण दारी आणि मरण दारी कार्य असते म्हणून जावे ही जनरीत झाली पण अशा प्रसंगी उपचार म्हणून सारेच जमतात, त्यात व्यवहाराचा भाग अधिक असतो, सौहार्द्र असतेच असे नाही. सौहार्द्र वाढण्यासाठी स्नेह हवा जो कधीच उपचारांच्या अधीन नसतो. स्नेह हा आत्मीयता आणि सहवेदना यांच्या खांद्यावर लहानाचा मोठा होतो आणि संवादाच्या सेतुवरून इकडून तिकडे बागडतो. तोच संवाद निरंतर रहावा म्हणून ‘कळावे’ ! 

याशिवाय ‘कळावे’ यामध्ये अनुस्यूत असते ती पोच… म्हणजे पोचपावती. बऱ्याच जणांना कधी, कुठे, कसे वागावे याची पोच नसते ती निराळी. अलीकडे भ्रष्टाचाराचा शिष्टाचार झाल्यापासून सामाजिक संकेत आणि नीती-नियम इतके बदललेत की वेषभूशेसह बोलण्या-वागण्याची पोच नसणे हे मॉडर्न असण्याचे लक्षण आणि ‘इन थिंग’ असण्याचे दिवस आहेत… ‘ट्रेंडिंग…’ यू नो ! तेही एक असो. तर पोचपावती म्हणजे साध्या शुद्ध मराठीत अॅकनॉलेजमेंट ! तुम्ही मला काही पाठविले ते प्राप्त झाले हे उलटटपाली कळविण्याची नैतिक जबाबदारी. आता यातील ‘नैतिक’ आणखीन ‘जबाबदारी’ या दोन्हीपाशी मिलेनीयल अडखळले तर ती कुणाची सामाजिक जबाबदारी?

पूर्वी बंद पाकिटात पत्र पाठवितांना त्यावर पाठविणाऱ्याचा तपशील ‘प्रेषक’ अशा शीर्षकाने लिहिण्याची पद्धत होती आणि ज्याला उद्देशून पाठविले तो ‘प्रेषित’…  म्हणजे अज्ञ लोकांनी क्रुसावर चढवला तो ईश्वराचा संदेशवाहक नव्हे तर सूज्ञ लोक ज्याच्याशी काही हितगूज करू पाहता तो संदेशग्राहक ! पण माणसांत हल्ली प्रेक्षक आणि पोषित असे दोनच प्रकार शिल्लक असल्याने आणि मुळात पाकीट बंद करण्याचा संस्कार कालबाह्य झाल्याने सारेच कसे उघड उघड चालते. व्यवस्था ज्याचे पोषण करते तो पोषित आणि तो जो काही तमाशा दाखवेल तो टाळ्या पिटत उघड्या डोळ्याने निष्क्रियपणे बघणारे ते प्रेक्षक ! व्यवस्थेला याहून अधिक (विचार-)विनिमयाची अपेक्षा नाही कारण विचारापेक्षा प्रचार आणि संभाषणापेक्षा भाषण अधिक प्रभावी ठरते असा सत्योत्तर अनुभव सांगतो. आणि प्रचार आणखीन भाषण या दोन्ही प्रकारांना चर्चा, विचारांचे आदान-प्रदान यांचे वावडे, त्यांना हवा फक्त श्रोता ज्याच्या फास्ट लोकलला श्रवण आणि भाषण यांच्या मध्ये अध्ययन, चिंतन, मनन असल्या बिनकामाच्या छोट्या छोट्या स्टेशन्सचा अडसर नसेल.

दूरदर्शनवर अलीकडे एक नवीन जाहिरात दिसू लागली आहे. ८ करोंड हून अधिक गाणी ऐकण्याची ‘सोय’ असल्याने, कानाला ‘श्रवणयंत्र’ लावलं की आजूबाजूला काय घडते आहे याचा त्रास करून न घेता स्वत:च्या मनोरंजनात मग्न राहण्याच्या ‘सुविधे’ची. स्वमग्नता, जो कालपरवापर्यंत एक मनोविकार मानला जात असे, आज त्याचा व्यापार होतो आहे आणि तुम्हाला जन्मत: या विकाराचा ‘लाभ’ झाला नसेल तर नाराज व्हायचे कारण नाही, तुम्ही तो विकत घेऊ शकता ! अत्याधुनिक उपकरणांमध्ये न्यूक्लिअर मिसाईल्सपेक्षाही विघातक आविष्कार जर कशाचा असेल तर तो आहे या ‘श्रवणयंत्र’ अर्थात हेडफोन्सचा. भौतिक प्रगतीच्या नादात आधीच पराकोटीच्या स्वकेन्द्रित झालेल्या माणसाला या आयुधाने केवळ स्वमग्नच नाही तर सभोवतालाप्रति अविचलीत (वाचा: बधीर) करण्याचे मोठेच क्रांतिकारी काम केले. याची तुलना होऊ शकणारे दुसरे एकमेव ‘साधन’ म्हणजे लाऊड स्पीकर अर्थात भोंगे ! महाराष्ट्राच्या ‘राज’कारणात तूर्तास हा विषय फारच तापलेला असल्याने त्यावर जास्त वाच्यता नको, चटके बसायचे. तथापि, ऐकायला हेडफोन्स आणि लाऊड स्पीकर परस्परविरोधी वाटत असले तरी, मानवी प्रज्ञेचा बुद्धिभेद करून विचारक्षमता कुंठित करणे आणि माणसाचा तमस वाढविणे या उद्देशाबाबत दोन्ही उपकरणांचा एकच सूर लागतो !

कुठलाही मोठा बदल, विशेषत: मानवी संबंधात, हा केवळ दोनच पद्धतीने होता असा एक समज आहे – उत्क्रांतीतून किंवा क्रांतीतून – बाय इव्होल्यूशन ऑर बाय रिव्होल्यूशन. उत्क्रांतीचा मार्ग जाणीवेतून येतो म्हणून सहसा शाहणीव देतो. जगण्याची, सभोवतालाची समज समृद्ध करतो तर क्रांतीचा मार्ग बहुदा उणीवेतून येतो. नवनवीन उपकरणांचे शोध, माध्यमक्रांती यामागे कुठल्या उणिवा दडलेल्या आहेत याचा जाणीवपूर्वक शोध घेतला तर बऱ्याच अकल्पित गोष्टी समजू शकतील. उर्जेचा शोध लागल्यापासून माणसाने झपाट्याने प्रगती केली आणि तंत्रज्ञानाने विकासाचा वेग महाविद्युल्लतेपरी वाढविला. माणसाने कोटीच्या कोटी (अक्षरश:) उड्डाणे घेऊन मागच्या ३०० वर्षात पार केले नव्हते एवढे अंतर गेल्या तीस-चाळीस वर्षात पार केले.

या प्रवासात अनेक कालबाह्य आणि कुचकामी थांबे मागे पडले. फास्ट लोकल्स बिनमहत्वाचे स्टेशन्स वगळू लागल्या. डांबराचा गुणधर्म अंगाखांद्यावर बाळगणारे आणि रंगरंगोटीने सजलेले टोलधारी उन्नत महामार्ग वाटेतल्या गावखेड्यांशी फटकून वागू लागले. पूर्वी गावाच्या पोटातून जाणारे मार्ग आता खालच्या वस्तीशी ओळखदेख न ठेवता उड्डाणपूलांच्या मार्गे परस्पर डोक्यावरून पसार होऊ लागले. गंतव्यस्थानाला पोहचण्याची घाई ‘वाढता वाढता वाढे…’ अशी नित्य वर्धिष्णू राहिल्याने पळती झाडे मागे पडून ‘बायपास’ची संख्या ऑर्गनाइज्ड पद्धतीने वाढू लागली.

अशा जीवघेण्या वेगामुळे ‘डरके आगे जीत है…’वाले थ्रील मिळत असेल तर मिळो बापडे पण आधी ‘डर’च मिळतो हे जाहिरातीलाही नाकारता येत नाही. भय घालवण्याचा सर्वकालिक रामबाण उपाय म्हणजे साथ – सोबत. लहानपणी भुतांच्या गोष्टी ऐकल्या की आधी लघुशंका लागायची आणि मग लघुशंकेलाही सोबत लागायची. ‘कुणीतरी आहे तिथं…’ची भीती घालवण्यासाठी ‘कुणीतरी आहे सोबत…’ यासारखा धीर नाही. मोठेपणी या ‘कुणीतरी’च्या भयाची जागा भविष्य म्हणजेच उद्याच्या काळजीने घेतली आणि उद्याबद्दलची अनिश्चितता आज अनेक व्यसनात दिलासा शोधू लागली. एका मोठ्या आणि उद्योगी समुदायाला निरुद्योगी करण्याची ‘आयडिया’ व्यावसायिकांना सुचली आणि संकटातही संधी शोधणाऱ्या राजकारण्यांना त्यात बरेच लाभार्थी दिसू लागताच रोज दीड जीबीचा रतीब सुरू झाला.

दोन पायावर तोल साधणे जमल्यामुळे पाठीचा कणा ताठ होऊन मोकळ्या झालेल्या ज्या हातांनी माणसाने स्वत:ची सृष्टी निर्माण केली त्या हातांना एका मामुली उपकरणाने स्थानबद्ध केले. मोठ्या मिनतवारीने शिकून सवरून अंगठेबहाद्दराचा बोरूबहाद्दर झालेल्या माणसाचा पुन्हा अंगठेबहाद्दर व्हायला एक जेमतेम विशीतली कोवळी ‘माध्यम’-क्रांती पुरली. एकेकाळी समाजप्रिय असणारा मनुष्यप्राणी, वेळेअभावी प्रत्यक्ष भेटून सुरेल बैठक जमविण्याऐवजी समाजमाध्यमाचे माध्यम होऊन बे(भे)सूर झुंडशाही करण्यात धन्यता मानू लागला. अंगठ्यासह हाताच्या पाचही बोटांच्या सर्जनशीलतेचा, त्यांनी मिळून बनणाऱ्या मुठीच्या सामर्थ्याचा माणसाला पडलेला विसर एकवेळ क्षम्य मानता आला असता परंतु त्याबरोबरीने संकुचित मानसिकतेने विचारांना पडलेल्या मर्यादा, विवेकाचा जाणीवपूर्वक केलेला त्याग आणि क्षुद्र, तत्कालिक स्वार्थासाठी केवळ नियतीशीच नाही तर येणाऱ्या पिढ्यांसह संपूर्ण सृष्टीशी केलेली तडजोड याला कसे माफ करावे ?

हे असे का झाले याची चिकित्सा करता अनेक कारणे सापडतील. पण साऱ्याचे मूळ मात्र एकच – भय, असुरक्षितता, अस्थिरता. प्रगती मध्ये गती अनुस्यूत असल्याने जेवढ्या वेगाने प्रगती होईल त्याच्या कित्येक पट वेगाने जगण्याची गती वाढेल हे ओघाने आलेच. आज जगण्याची स्पर्धा आणि त्यामुळे गती इतकी भयाकारी झाली आहे की ज्यासाठी सगळी उठाठेव चालली आहे ते चलन जरी खिशातून पडले तरी थांबून ते उचलण्यापेक्षा तेवढ्या वेळात त्याहून जास्त कमवणे शक्य असल्यास तेवढाही खोळंबा माणसाला नको आहे, ठहराव, उसंत, निवांतपणा यांची तर बातच नको. अशा परिस्थितीत हितगुज-चर्चा अशा निरर्थक उद्योगांपेक्षा आपल्याच भ्रामक जगात रमणे कधीही सोपे आणि सोईस्कर !

विठ्ठलाच्या प्रेममय वर्णनात रममाण झालेल्या स्त्री रुपकातील माऊली जेव्हा,
शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादू। हे तव कैसेनि गमे II
परेहि परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनि सांगे II

म्हणतात तेव्हा त्यांना, ‘मी, माझे, मला’ यात आकंठ बुडालेल्या माणसाने दुसऱ्याशी हृदयापासून संवाद साधण्याऐवजी मनाची सारी कवाडे बंद करून भलत्याच अर्थाने अंतर्मुख होणे अभिप्रेत नाही. अशा उफराट्या आध्यात्माच्या मार्गावर एकटे पडणे ही संतांचे लक्षण तर नाहीच पण समर्थांना मूर्खाचे आणखी एक लक्षण सापडल्याने नवा (उ)दासबोध लिहिण्याचे निमित्त मात्र ठरू शकते.

तात्विक किंवा अध्यात्मिक राहू दे, अगदी न्यूटनचा तिसरा संपूर्ण शास्त्रीय नियम सुद्धा क्रियेला प्रतिक्रिया गृहीत धरतो, मग संवादामध्ये सादेला प्रतिसाद गृहीत धरण्याचा संकेत हा शास्त्रीय का मानू नये ? हाकेला ओ देण्याची पद्धत पशुपक्ष्यांमध्येसुद्धा आढळते तर अतिप्रगत माणसाला आपल्या प्रगत असण्याचा टेंभा मिरविण्यासाठी भलत्याच अर्थाने उदासीन रहावेसे का वाटावे? आधुनिकतेच्या अति हव्यासापोटी फाटक्या कपड्यांची फॅशन व्हावी तद्वत माध्यमांच्या अतिरेकी वापरात संवादाची लक्तरे निघाली तरी चालतील? साधनक्रांतीने ‘शब्देविण संवादु’ची भलतीच सोय करून दिलेली असल्याने, प्रतिसादाची अपेक्षा न धरता ‘डबल ब्ल्यू टिक’वर समाधान मानावे? रिकाम्या गाभाऱ्याला ‘भाव तेथे देव’ म्हणत मनोभावे नमस्कार करावा आणि आपली भक्ती पोहचली, अनुग्रहाची सक्ती नाही एवढाच साऱ्याचा भावार्थ?

बाकी, वैभव म्हणाला तेच खरे… तुम्ही व्हॉटसअॅपवर आहात ना, तर मी तुमचा आहे!

तळटीप: उपरोक्त लिखाणात हनुमान जयंतीच्या निमित्ताने, हनुमान चालीसा नाही तरी, मारुतीस्तोत्रातील काही वचनांचा चपखल वापर सूज्ञ वाचकांस आढळेल… आम्हीही आस्तिकच आहोत याचा दाखला…!

शुभम भवतु !

Et Cetera

फॉर्वर्ड…?

विचारांना तिजोरीत कोंडून
आणि विवेक पणास लावून
बुद्धीची हमाली करणारे
आपण सारेच लाभार्थी…

की,

कसलेतरी पांग फेडण्याच्या भ्रमात
आपल्याच कुठल्या क्षुद्र स्वार्थासाठी
कुणाही मर्त्याला सहज शरण जाणारे
आपण सारेच शरणार्थी…

की,

धर्माच्या नावाने निधर्मीना अधर्मी ठरवून
सर्वत्र केवळ द्वेषधर्माचेच संवर्धन करीत
अध्यात्म आणि धर्माची गफलत करणारे
आपण सारेच परमार्थी…

की,

‘संस्कृती’च्या उपासनेसाठी
‘संस्कारां’च्या अभ्यासवर्गात
गणवेशधारी बेगमी करणारे
आपण सारेच विद्यार्थी…

की,

सत्य धारातीर्थी पडलेले पाहून
बेगडी अस्मिता जपायची म्हणून
रोज प्रबोधन संदेश पाठवणारे
आपण सारेच …स्वार्थी?

Et Cetera

विकल्प…?

चरितार्थाच्या रतिबावर संकटाची चाहूल लागताच
अध्यात्मिक अनुभूतीचे फुटलेले पेव
अन विरक्तीचे काढलेले सोंग…

अनिश्चिततेचे दाट धुके थोडेसे धूसर होताच
प्रच्छन्न आसक्तीने ओथंबून जात
आज उरले नुसतेच ढोंग…?

बहुतांच्या विवंचनेत संधी शोधून अन साधून
आपली तुंबडी भरणाऱ्या चाणाक्षांना
‘सोय’रे म्हणावे कि आप्त…

दिखाव्याच्या झगमगाटात नीतीचे अर्घ्य देऊन
आर्थिक ‘गुलामगिरी’चे आज्ञाधारक पालन
‘प्रामाणिक’पणाला क्रमप्राप्त…?

विचारशून्य विकारांची अहमहिका बोकाळलेली
व्हावे आपणही सामील सोहळ्यात विसंबून
विवेकशून्य मिंध्या भाषेवर…

कि रहावे व्रतस्थ शेवटच्या मानवहिताच्या धारणेत
समष्टीच्या समग्र शहाणिवेवर विश्वासून
गतिमान संतुलनाच्या आशेवर…?

*विकल्प…?

Et Cetera

कालत्रयी…

सत्य, तत्व, नीती, निष्ठा
साऱ्यांशी तडजोड करून उभारलेल्या
संपत्तीच्या भिंतीला समृद्धीचे लिंपण करून
त्यावर ठोकलेली अस्तित्वाच्या भीतीची खुंटी
टांगायला गैरसोयीच्या गोष्टी…

उदाहरणार्थ,
समता, निरपेक्षता, तर्क, विवेक… इत्यादी
आणि झालंच तर त्यांची महापुरुषरुपी प्रतीकेही…
…काळ-वेळ बघून त्यांच्याकडे पाठ फिरवायला.

दुसरी खुंटी, बाजूलाच…
सत्य आणि असत्याच्या खिळ्यांनी ठोकलेली
‘बातमी’च्या जोरावर जगणाऱ्या ‘सत्योत्तरा’ची…
या खुंटीवर अडकवलेल्या सोन्याच्या साखळीचे
दुसरे टोक गळेपट्ट्यात…

केवळ धन्याच्या सुरक्षेसाठी रात्रंदिन दक्ष राहून
दिलदार धनिकाची सोय पाहता पाहता
आपल्याही उदनिर्वाहाची सोय पहाणाऱ्या आणि
एरवी डोळे मिटून बकध्यानात तंद्री लावणाऱ्या
इमानी पाळीव प्राण्यांप्रमाणे…

अडचणीच्या गोष्टींचे अस्तित्वच नाकारण्यासाठी
दोन्ही डोळे मिटून घेणाऱ्या भाविकांना पडतोय
विसर त्यांच्या आराध्य दैवताच्या तिसऱ्या नेत्राचा
रुद्राच्या तांडवाची परिसीमा अशा प्रतिकाचा…

‘मौनं सर्वार्थ साधनं’ची सोय नसते सेवकरूपी सम्राटाला
मार्गक्रमण करावेच लागते मानगुटीवरच्या समंधासह
‘तू बोला, मैं चला…’ची पंचवीस आवर्तने चुकत नाहीत
आणि मौनात राहून डोक्याची शंभर शकले होणे अटळ
अशा समयी गोष्टी सांगीन युक्तीच्या चार हाच आपत्धर्म

…पण कितीही त्रासदायक वाटला तरी
वेताळच आपला तारणहार आहे याचा
विसर पडू नये विक्रमादित्याला,
कालत्रयी…

Et Cetera

भाट…?

नीतीची लक्तरे टांगता वेशीवर
समृद्ध विकासाची उंचावे लाट…
सचोटी रडते सत्य-निष्ठेच्या दारी
सोय लावते ‘नव’मूल्यांशी पाट…

तत्व तिलांजलीला बक्षीस भरघोस
श्रावणी खाण्या नित्य सोन्याचे ताट
सदऱ्या-धोतरा खिजवण्या अन्
नव्या उत्सवी पोशाखाचा थाट…

त्यांचा धर्म त्यांची श्रद्धा त्यांची भक्ती
भोगण्याची सक्ती, जगण्यावर काट…
अंधभक्तीची अंधश्रद्धा बोकाळता
कर्णही धरीतसे कौरवसभेची वाट…

धर्माधिष्ठित राजसत्तेने सर्वत्र
घालता विवेकवधाचा घाट
प्रतिहारी जो व्हायचा शाहीर
व्यवस्था करीतसे त्याचा भाट…!

Et Cetera

सतर्कता…!

टूथपेस्ट, साबण की तेल हे महत्वाचे नाही, खोक्यात येणारी एक नित्योपयोगी वस्तू एवढे पुरेसे आहे कारण, तिची (त्या वस्तूची !) गोष्ट, त्याचा कार्यकारणभाव आणि (नेहमीप्रमाणे) गोष्टीचे तात्पर्य महत्वाचे ! तर अशा कुठल्याशा वस्तूच्या कारखान्याच्या व्यवस्थापनाला एका वेगळ्याच अडचणीला सामोरे जावे लागले. त्यांच्या वितरकांना बऱ्याच ग्राहकांकडून चक्क रिकामे खोके मिळाल्याची तक्रार आली आणि असे वारंवार घडू लागल्यास बाजारात कंपनीची प्रतिमा खराब होऊन कंपनीला मोठा आर्थिक फटका बसू शकतो अशी भीती निर्माण झाली.

यावर उपाय म्हणून कंपनीने तातडीने एक उच्चस्तरीय तज्ञ समिती नेमली आणि त्यांना परिस्थितीचा सखोल अभ्यास करून उपाययोजना सुचविण्याची विनंती केली. कारखान्याच्या परिसराची हवाई टेहळणी पासून संपूर्ण यंत्रसामुग्रीचे परीक्षण आणि प्रत्येक कामगाराची वैयक्तिक मुलाखत घेतल्यावर कुठेही काही बिघाड आढळला नाही. परिणामी समितीने, कारखान्यात जेथून खोक्यांचे वितरण सुरू होते तेथे एक वजनमापक यंत्र बसविण्याची सूचना केली जेणेकरून रिकाम्या खोक्याचे वजन कमी भरल्याने एक अलार्म वाजेल आणि रिकामा खोका काढून टाकता येईल.

बराच निधी खर्च करून कंपनीने तज्ञ समितीची सूचना अमलात आणली आणि यंत्राने आपले काम सुरु केले. आता रिकामा खोका बाजारात जाणार नाही या विचाराने व्यवस्थापन निर्धास्त झाले. पण थोड्याच दिवसात एका वेगळ्याच अनुभवाने व्यवस्थापनाला पुन्हा बुचकळ्यात पाडले. वजनमापक यंत्र बसवल्यापासून रिकामे खोकेच सापडत नसल्याचा अहवाल आला. आता हे कसे घडले याचा शोध घेण्यासाठी व्यवस्थापक पुन्हा कारखान्यात पोहचले. तपासाअंती आढळले ते असे…

रिकाम्या खोक्यांची संख्या बरीच असल्याने वजनमापक यंत्र सारखे अलार्म वाजवायचे आणि त्यामुळे कामाची गती कमी होऊन खोळंबा तर व्हायचाच शिवाय त्या अलार्मच्या किरकिऱ्या आवाजाचा त्रास व्हायचा तो वेगळाच. यावर उपाय म्हणून एका कल्पक कामगाराने वजनमापक यंत्राच्याअलीकडे वितरण पट्ट्याच्या समोर एक पंखा उभा केला. पट्ट्यावरून रिकामा खोका पंख्यासमोर आला की हलका असल्याने पंख्याच्या हवेने उडून खाली पडायचा आणि वजनमापक यंत्रापर्यंत न पोहचल्याने अलार्मही वाजायचा नाही आणि वितरणाची साखळीही तुटायची नाही!

उच्चस्तरीय तज्ञ समितीने हा साधा-सोपा-सहज-स्वस्त उपाय का सुचवला नाही या विचाराने व्यवस्थापन समिती अजूनही संभ्रमात आहे, बघा तुम्हाला काही सुचतय का…?

विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर होणार नसेल किंवा कमी होणार असेल तेव्हा विजेची बचत व्हावी म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पॉवर-सेव्हिंग मोडची सोय करून दिली. वापरकर्ता जेव्हा उपकरण वापरत नसेल तेव्हा ते अशा पॉवर-सेव्हिंग मोडवर अर्थात मेडीटेशन फेजमध्ये जाते. व्यवस्थेच्या बाबतीत मात्र जेव्हा उपभोक्ता तिचा अपेक्षित आणि सुयोग्य वापर करत नसेल तेव्हा ती पॉवर-मिसयूज मोडवर अर्थात सेलिब्रेशन फेजमध्ये जाते !

पोस्ट पूर्णपणे अराजकीय आणि व्यवस्थापन-वस्तुपाठाशी निगडीत असली तरीही, डोळस आणि विवेकी लोकांनी जमल्यास यावर विचार [चिंतन नव्हे] करण्यास हरकत नाही… एव्हरीवन एल्स, सॉरी फॉर द इंटरव्हेनशन… प्लीज कंटिन्यू द सेलिब्रेशन !

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा… लेट देअर बी लाईट! …आणि हो, तुम्हालाही असा सुलभ उपाय आवडत असेल तर ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ करून वरीलप्रमाणे प्रशस्तीपत्र मिळवण्यासाठी इथे भेट द्या !

Et Cetera

झेप…!

माझी प्रज्ञा घडवलेली
माझी भाषा पढवलेली

माझा गणवेश चढवलेला
माझा अभिनिवेश मढवलेला

माझी संपत्ती साठवलेली
माझी प्रतिष्ठा वाढवलेली

माझी जाणीव गोठवलेली
माझी संवेदना रोडवलेली

माझी योग्यता सडवलेली
माझी धारणा रटवलेली

माझा विचार तुडवलेला
माझा विकास बुडवलेला

पोस्ट ट्रुथ आणि न्यू नॉर्मल
या अनाकलनीय पसाऱ्यात
‘तेज चल’ हाच सुखमंत्र
.
.
.
तरीही आज मी स्वतंत्र…?

Et Cetera

अंकुश…!

खुर्चीमुळे सत्ता येते
सत्ता वाढविते मद
मदांध सत्तेचा दंभ
अविनाशी I

बेताल निर्णयांचे फर्मान
अंमलबजावणी कोडगी
सचोटीची थडगी
जागोजागी I

देवही सारे उभे
इंद्राला हवे आसन
देवादिकांचे वाहन
प्राणीपक्षी I

महाभारत ते मिर्झापूर
सत्तेची आंधळी भूक
प्रजा सारी मूक
सर्वसाक्षी I

सत्तेवर हवा अंकुश
विवेकी बाण्याचा
बैल तो घाण्याचा
अनाठायी I

Et Cetera

दातृ-छत्र..!

नेमेची येतो मग पावसाळा… लवकरच लॉकडाऊनचा बंदिवास संपेल आणि पाऊस सुरू होईल. पण म्हणून हिरमुसायचे कारण नाही. बाहेर पडण्याची लगबग आणि भरून आलेला पाऊस यांची सांगड घालायला नेहमीच सज्ज असते ती… छत्री ! जुनी सापडत नसेल, हरवली असेल किंवा वापरण्यायोग्य राहिली नसेल आणि नवीन छत्री विकत घेण्याच्या विचारात असाल तर… 

छत्रीचा शोध घेण्यापूर्वी आणि खरेदी करण्यापूर्वी एकदा हे जरूर वाचा… तुमच्या एका खरेदीत दोन हेतू साध्य होतील… तुम्हाला पावसात कोरडे राखतांना, स्वत:च्या पायावर हिमतीने उभे राहणाऱ्या कुणा अंध व्यक्तीच्या मनात तुमच्या स्नेहाची, सहवेदनेची ओल रूजतांना पाहता येईल… छत्री हे तर केवळ निमित्त आहे, गरज आहे पावसापासून स्वत:चा बचाव करतांना कुणाच्या तरी जाणिवात चिंब भिजण्याची… एकदा सर्व दुवे पहा आणि खात्री पटल्यास छत्री खरेदी करा… निर्णय तुमचा आहे !

संपूर्ण कॅटलॉग इथे बघाhttps://drive.google.com/file/d/1czwrddJJ__6-Pxemg6ffvunWEXnERKW-/view?usp=sharing

या उपक्रमाविषयी संपूर्ण तपशील येथे पहा https://nadeindia.wordpress.com/2019/05/08/nethra-umbrellas-create-employment-for-people-with-disabilities/

ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा – 9137239065

Et Cetera

उत्सव…?

विषाणू मुक्त, आम्हां कारावास
लशीचा डोस, नाममात्र II

खोटा कळवळा, खोटाच प्रचार
विषाणूचा वार, जीवघेणा II

हातही रिकामे, बाजारही ओस
रिकामेच कोस, जागोजागी II

शेठजीस चिंता, बाजारभावाची
उपाशी जीवाची, घालमेल II

बोकाळले दुष्ट, सारा दुराचार
नाहीच आधार, सामान्यासी II

जीव आगतिक, जगणे हताश
न्यायाची तलाश, प्रजाजना II

पोकळ नामघोष, जळते वास्तव
रिकामा उत्सव, लज्जाहीन II

नुरता विवेक, कशाची भीती
दांभिक नीती, मूल्याविना II

तुतारी फुंकुनी, बडवी ढोलकी
रडते पोरकी, लोकशाही II

आद्य समाजसुधारक, क्रांतिसूर्य, युगपुरुष
महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या जयंतीनिमित्त सादर समर्पित

Et Cetera

त्रिसूत्री

सत्य – स्वयंशिस्त – संयम

सत्य – अर्धसत्य नव्हे, साखरेत घोळलेलं सत्य नव्हे आणि सत्योत्तर सत्य (Post-Truth) तर मुळीच नव्हे. उन्हाने तापलेल्या जमिनीवर पावसाचा पहिला थेंब पडताच जो मृद्गंध सुटतो त्याच्या ताजेपणाइतके आल्हाददायक सत्य. रोज सकाळी जो प्राजक्त फुलतो त्याच्या फुलण्याइतके टवटवीत सत्य. रानांत जो वारा वाहतो त्याच्या वाहण्याइतके बंधमुक्त सत्य. पक्षांना कूजन करायला लावणाऱ्या ऋतूबदलाइतके रोमांचित सत्य. बाळाच्या निरागस हास्याइतके लोभसवाणे सत्य. सूर्याच्या तेजाइतके झगझगीत सत्य !

सत्य कमी-अधिक होऊ शकत नाही, सत्याची तोड-जोड होऊ शकत नाही आणि सत्याला कठोर किंवा सौम्य करता येत नाही कारण मग ते सत्य उरत नाही. आणि जे सत्य नाही ते असत्यच… त्यात टक्केवारी नसते. मी ९९% प्रामाणिक असल्याने ९९.९९% सत्य सांगितले, असे नसते. मी एकतर प्रामाणिक असतो किंवा दांभिक, तिसरी अवस्थाच असू शकत नाही आणि ती जर मी प्रयत्नपूर्वक तयार केली तर त्यामुळे प्रचलित होणाऱ्या समग्र समाजव्यवस्थेला आणि सर्वंकष परिणामांना ‘मी’च जबाबदार ठरतो. 

‘नरो वा कुंजरोवा…’ असे सोईस्कर संदिग्ध ‘सत्य’ बोलून ‘धर्म’ राखता येत नाही तर ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर…’ अशा बाणेदारपणे ‘दुधका दुध और पानीका पानी’ करण्याची नीरक्षीर वृत्ती बाळगली तरच इतरांचा अधिक्षेप आणि न्याय-निवाडा करण्याचा नैतिक अधिकार मिळवता येतो. अर्थात शतप्रतिशत सत्य जाणून घेणे आणि त्यातीलही समर्पक तेवढेच सांगणे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तर करावे लागतातच पण अगदी लहानपणापासून निरोगी नितीमत्तेचे बाळकडू मिळून नैतिक धैर्याची जोपासना व्हावी लागते. प्रसंगी समस्तांचा रोषही पत्करावा लागतो कारण वेगळी वाट निवडून मार्ग खडतर करून घेण्यापेक्षा ‘श्रावणी’ खाणे केव्हाही सोपे असल्याने ‘सारेच करतात…’ची झापडं लावणं साऱ्यांनाच सोईस्कर ठरते.

सूर्यप्रकाशाच्या मार्गात अडथळा निर्माण झाला की ग्रहण अटळ, तद्वतच सत्याशी आपलाप केल्यास असत्य आणि त्यायोगे होणारी फसवणूक अटळ. ग्रहण हे अशुभसूचक, सुतकी मानण्याचे जसे ‘शास्त्र’ आहे तसेच असत्य हे अनिष्ट, अभद्र आणि विध्वंसक म्हणून त्याज्य मानावे असे मूळ नीतीशास्त्र सांगते !    

स्वयंशिस्त – सत्याइतकेच महत्वाचे दुसरे सूत्र – केवळ शिस्त नव्हे, स्वयंशिस्त ! याचे कारण शिस्त ही कुणीतरी लावावी आणि इतरांनी पाळावी असे गृहीतक असते. बऱ्याचदा शिस्त लावणारा स्वत:ला सवलत देतांना दिसतो तर ती पाळण्याची सक्ती असणारे शिस्त लावणाऱ्याचा आदर बाळगण्याऐवजी तिरस्कार करतांना आढळतात. यामुळे शिस्तीचा मूळ उद्देश तर सफल होत नाहीच पण शिस्त लावणारा त्यायोगे इतरांचे आपल्याला हितकर असे अनुकूलन (Conditioning) करण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही प्रकारचे कौतुक किंवा इनाम मिळण्याची सुतराम शक्यता नसतांनाही वैयक्तिक जीवनात, स्वत:सह इतरांना दिलेला शब्द, वेळ पाळणे, सार्वजनिक जीवनात नियमांचे आणि सामाजिक जबाबदारीचे पालन करणे आणि आपल्यामुळे कुणालाही कुठल्याही प्रकारची असुविधा किंवा त्रास होणार नाही याची काळजी घेणे, हे स्वयंशिस्तीचे काही अत्यंत प्राथमिक मापदंड सांगता येतील.

Initiative is doing the right things without being told… अर्थात, ‘कुणाच्याही निर्देशांची वाट न पाहता सुयोग्य, समुचित गोष्टी करणे म्हणजे पुढाकार…’ पुढाकाराची ही सटीक व समर्पक व्याख्या स्वयंशिस्तीलाही तंतोतंत लागू पडते. कुणीही बघत नसतांना तुम्ही कसे वागता, कुठल्याच प्रकारे परतफेडीची काहीही शक्यता नसतांना तुम्ही कुणा अपरिचित, अनोळखी गरजवंतासाठी काय करता आणि कुणालाही काही उत्तरदायित्व नसतांनाही तुम्ही ज्या गोष्टी करणे स्वाभाविकपणे अपेक्षित आहे त्या कशा करता, यावरून तुमच्या स्वयंशिस्तीची प्रतवारी जोखता येते. 

तिसरे आणि सर्वात महत्वाचे सूत्र संयम – अर्थात विकार, वासना आणि व्यय यावर विवेकाचा पहारा ! विकारातून वासना उपजते आणि वासना शमविण्यासाठी व्यय होतो, ज्याच्या प्रयोजनासाठी तेवढ्याच किंबहुना अधिकच मात्रेत आय अर्थात अर्थप्राप्तीची येन-केन-प्रकारेण सोय करावी लागते ज्यातून अधिकच विकार उत्पन्न होतात.. असे हे दुष्टचक्र आहे.

यातून मुक्ती मिळविण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग म्हणजे विवेकाची कास धरणे. विवेक (Conscience) बाळगण्याचा आणि जोपासण्याचा एक अत्यंत सोपा आणि कुणालाही सहजसाध्य उपाय म्हणजे मनात आलेल्या कुठल्याही विचाराचा कार्यकारणभाव जाणून कृती करणे आणि कृतीपूर्वी केवळ दोन प्रश्नांचे उत्तर तपासणे – ‘हे करणे खरोखरच आवश्यक, पर्याप्त आहे का ?’ आणि ‘त्यासाठी नेमकी किती किंमत मोजावी लागेल किंवा त्याचे दूरगामी परिणाम काय होतील ?’ एवढा साधा नियम जरी नित्यनेमाने पाळला तरी विवेकाचे किमान उपयोजन केल्यासारखे होईल… हेही नसे थोडके !

आजच्या जगातील राजकीय, आर्थिक, सामाजिक तथा शैक्षणिक क्षेत्रातील आपापल्या अवकाशाचे नेतृत्व करणाऱ्या आणि त्यायोगे एका समग्र समाज परिवर्तनाचे अध्वर्यू (protagonist) ठरू शकणाऱ्या, ८०% लोकसंख्येला प्रभावीत करणाऱ्या सधन, सक्षम आणि स्वतंत्र अशा २०% निर्णयक्षम लोकांपैकी केवळ ५०% समाजधुरीणांनी या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन केले तर आज फारसे आदर्श (utopian?) नसणारे समाजाचे चित्र बदलण्यास, अधिक मानवी आणि सकारात्मक होण्यास एका पिढीचा अवकाश पुरावा…

जाता जाता – मार्केटिंग मॅनेजमेंटच्या थिअरीमध्ये मार्केटिंग रणनीती म्हणून USP अर्थात युनिक सेलिंग प्रपोजीशन (विक्री वैशिष्ट्य) याचा खूपच महत्व दिलेले आहे. सत्य-स्वयंशिस्त-संयम या त्रिसूत्रीचे इंग्रजीकरण करायचे झाल्यास Unadulterated-Truth, Self-Discipline and Patience म्हणजेच  USP असे होते हा निव्वळ योगायोग की यात काही Pointer अर्थात सूचक संकेत आहे…?

शुभम भवतु !  

सुरक्षित रंगोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

Et Cetera

ऑफर

मेंढपाळ आपल्या रोजच्या वाटेने आपली मेंढरं चारण्यास नेत होता तेवढ्यात एक आलिशान मोटार करकचून ब्रेक लावत त्याचा मार्ग अडवीत उभी झाली. मोटारीचे दार उघडून सुटा-बुटातलं एक नखशिखांत शहरी ध्यान उतरलं आणि मेंढपाळाला खीजवीत म्हणालं, ‘मी आत्ता इथे उभ्या उभ्या तुझ्याकडील मेंढरांची संख्या सांगितली तर त्यातील एक मेंढरू मला बक्षीस देशील…?’

अभ्यागताच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटल्याने आणि तो काय करतो याचं कुतूहल असल्याने मेंढपाळ म्हणाला, ‘अवश्य! तू जर खरोखरच बरोबर आकडा सांगितलास तर तू तुला यातलं हवं ते घेऊ शकतोस!’ मेंढपाळाचे उत्तर ऐकताच शहरी बाबूने आपला लॅपटॉप उघडला, काही सेटिंग्ज करून काही प्रोसेसेस रन केल्या आणि मोठ्या उत्साहात जाहीर केले, ‘मित्रा, तुझ्याकडे नेमके १,३२४ प्राणी आहेत!’

त्याच्या या करामतीने प्रभावित झालेला मेंढपाळ म्हणाला, ‘अगदी बरोब्बर, तू जिंकलास, हो पुढे आणि घे तुझं बक्षीस स्वत:च्या हाताने!’ आपल्या कर्तुत्वावर खूष होत सूट पुढे झेपावला आणि त्याने एक प्राणी आपल्या ताब्यात घेतला.

आता पाळी मेंढपाळाची होती, तो म्हणाला, ‘साहेबा, तुझ्या करामतीची प्रचीती तर आली, आता माझी पाळी. मी माझी सारी मेंढरं पणाला लावून जर तुझा पोटापाण्याचा उद्योग ओळखला तर तुझी मोटार मला देशील?’

‘का नाही?’ शहरी ध्यानाला या गावंढळ माणसाशी खेळाची आता गम्मत वाटू लागली होती.

क्षणाचाही विलंब न लावता मेंढपाळ म्हणाला, ‘तू कन्सलटंट आहेस, फी घेऊन लोकांना सल्ला देतोस!’

‘अरेच्चा! तुला कसे समजले?’ अचंबित होत कन्सलटंट म्हणाला.

‘सोपं आहे!’ मेंढपाळ सांगू लागला, ‘एक तर तुला कुणीही न बोलवता तू माझ्या वाटेत कुठूनसा टपकलास. तू सूट-बूट घालून महागड्या मोटारीतून आलास. मी तुला काहीही विचारले नसतांना तू मला असे काही देण्याची ऑफर दिलीस जे मला मुळी नकोच होते. आणि एवढे सारे होऊनही, तुला माझ्या कामाबद्दल काहीही माहित नाही… माझी मेंढरं मला राहू दे, तुझी गाडी तुला राहू दे फक्त मगाशी बक्षीस म्हणून माझा राखणीचा कुत्रा उचललास तेवढा परत कर!’

———————————————————–

हा निव्वळ, निखालस आणि निरागस विनोद असून त्यामागे कुणालाही दुखविण्याचा किंवा हेटाळणी करण्याचा हेतू नाही. शिवाय याचा कुठल्याही सांप्रत स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक घडामोडींशी संबंध नाही, तेव्हां उगाच ‘मेंढपाळ हे शेतकऱ्यासाठी, कन्सल्टंट हे भांडवलवाद्यांसाठी (किंवा राजकारण्यांसाठी!) आणि मेंढरं, कुत्रा हे… योजलेले रूपक आहे’ वगैरे जावईशोध लावून लेखकाच्या मनातही नसलेले योगायोग जुळवून आणू नये ही नम्र विनंती!

Et Cetera

Republic…!

India is not just another Land…
It’s a Dreamland!

India is not just History and Culture…
It’s an epitome of Heritage and Agriculture!

India is not just our Nation…
It’s our Passion!

India is not just our Country…
It’s our collective Responsibility!

Let us Celebrate the Real Spirit of Republic of India by holding our
Democratic Values Higher and Higher!

Let us make this Largest Democracy of the World
even Bigger, Better and Stronger…

Because…

WE’ are DEMOCRACY…!

Happy Republic Day to all Indians who are…
Aware, Unbiased and Socially Responsible…!

Way to go…

Et Cetera

सिग्नल…?

मायक्रोसॉफ्ट कंपनीत एका माणसाने सफाई कर्मचाऱ्याच्या पदासाठी अर्ज केला. मुलाखतीचे बोलवणे येऊन त्याची प्रात्यक्षिक चाचणी झाली आणि त्याने आपले काम अतिशय सफाईने केल्याने त्याची ताबडतोब निवड झाली. नेमणूक अधिकारी त्याला म्हणाला, ‘तुझा इमेल आयडी दे म्हणजे पुढच्या औपचारिकता तुला मेलने कळवतो.’

उमेदवार म्हणाला, ‘माझ्याकडे इमेल आयडी नाही आणि मला ते वापरता देखील येत नाही!’

मायक्रोसॉफ्ट नेमणूक अधिकारी अवाक होत म्हणाला, ‘अरेच्चा, असेही लोक असतात? हे बघ, ज्यांच्याकडे स्वत:चा इमेल आयडी नाही अशी माणसे आमच्या दृष्टीने अस्तित्वातच नसतात, तेव्हा आम्ही तुला रुजू करून घेऊ शकत नाही, माफ कर!’

मायक्रोसॉफ्टच्या इमारतीतून निराशेने बाहेर पडलेल्या उमेदवाराने खिशातली शेवटची दहाची नोट काढली आणि काय करावे अशा विचारात असतांना त्याला समोरच्या दुकानात लालजर्द आणि ताजे टवटवीत टोमॅटो दिसले, त्याने त्या पैशांचे टोमॅटो विकत घेतले आणि दारोदार जाऊन विकले तर त्याला जवळपास १००% फायदा झाला. यामुळे खूपच उत्साहित होऊन त्याने दुसऱ्या दिवशी आणखी जास्त टोमॅटो घेऊन विकायचे ठरवले आणि सकाळी लवकर उठून तो कामाला लागला आणि रात्री उशिरापर्यत त्याने सर्व टोमॅटो विकले तर त्याची उलाढाल १० वरून ५० पर्यंत गेली.

अनुभव आणि भांडवल वाढत गेले तसे त्याने हळूहळू आधी हातगाडी, मग टेम्पो, काही काळाने स्वत:चा मालवाहू कंटेनर ट्रक अशी प्रगती करत साधारण २० वर्षांच्या काळात त्या शहरातला एक आघाडीचा टोमॅटोचा व्यापारी म्हणून नाव आणि प्रतिष्ठा कमवली आणि स्वत:च्या कंटेनर्सची आणि गोदामांची भली मोठ्ठी साखळी उभी केली. आता आपला व्यवसाय देशाबाहेर देखील नेऊन जगभरातील बाजारात आपला माल निर्यात करावा म्हणून त्याने सिद्धता केली. तथापि या सर्व व्यापाची आणि आपल्या कुटुंबियांची सुरक्षितता म्हणून त्याने सगळ्याचा विमा काढायचा ठरवले आणि एका विमा प्रतिनिधीस चर्चेस बोलावले.

सर्व विमा योजनांची तपशीलवार माहिती घेतल्यानंतर त्यातील काही निश्चित करून त्याने विमा प्रतिनिधीला सोपस्कार पार पाडायला सांगितले तेव्हा प्रतिनिधी म्हणाला, ‘सर, आपला इमेल आयडी द्या, मी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आपल्याला मेल करतो.’ यावर व्यापारी म्हणाला, ‘मित्रा, माझ्याकडे इमेल आयडी नाही.’ प्रतिनिधी आश्चर्याने म्हणाला, ‘सर, इमेल आयडी नसतांना आपण एवढे काही करू शकलात, विचार करा वीस वर्षांपूर्वीच तुम्ही इमेल आयडी काढला असता तर आज कुठे असता…?’

डोळ्यातले मिष्कील भाव न लपवता व्यापारी म्हणाला, ‘तर आज मी मायक्रोसॉफ्टमध्ये सफाई कर्मचारी असतो…!’

———————————————————————-

गेली सुमारे २० वर्षे ह्युमन रिसोर्स (नव्हे, राईट्स!) आणि मॅनेजमेंट (नव्हे, डेव्हलपमेंट!) अर्थात मानव संसाधन (केवळ साधन नव्हे!) क्षेत्राशी या ना त्या प्रकारे निगडीत असल्याने या विषयातील अनेक खाचाखोचा, खाचखळगे आणि चांगल्या(?)वाईट पद्धती (प्रॅक्टिसेस, यू नो!) यांचे जेवढे जवळून (खरेतर आतून-बाहेरून म्हणणे जास्त सयुक्तिक ठरावे!) निरीक्षण-परीक्षण-विश्लेषण करता आले तेवढ्याच किंबहुना त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात या क्षेत्रातील विषयांवरचे विनोद, किस्से ऐकण्यात आणि पहाण्यात(ही) आले! नवीन सहस्त्रकाच्या आसपास बोकाळलेला (व्हायरल झालेला, हो!) असाच हा एक किस्सा…

हा किस्सा किंवा विनोद असण्याची कारणे तीन –
१. उद्योजकता रक्तात असलेला माणूस नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणार नाही, सफाई कर्मचाऱ्याच्या तर नाहीच!
२. व्यवसायात वाढ होत असतांना अनेक हातांची आणि तज्ञांची मदत लागते, ते नियुक्त करता येतात.
३. मायक्रोसॉफ्ट इमेल आयडी नाही म्हणून कुणालाही काहीही नाकारणार नाही उलट अत्यंत तत्परतेने नवीन आयडी काढून देण्यास मदत करेल कारण त्यामुळे कर्मचारी तर मिळेलच शिवाय एक ग्राहकही… विन-विन सिच्युएशन!

आज हा आठवण्याचे कारण, पुन्हा एकदा… कोव्हीड आणि त्याचे मूलगामी आणि दूरगामी परिणाम. केवळ इंटरनेट आणि इमेल यांच्या मदतीनेच वर्क फ्रॉम होम शक्य झाले हे सत्य असले तरी त्या प्रकारच्या कामाचा उबग येऊन (की त्यातले व्यर्थता जाणवून?) अनेकांनी परखड आत्मपरीक्षण करून बॅक टू बेसिक्स असा (टोमॅटो विकण्याचा?) मार्ग निवडला हे त्याहून मोठे साक्षात्कारी सत्य ठरले हे नाकारून चालणार नाही. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांच्या गेल्या काही काळात, विशेषत: गेल्या काही महिन्यात, दिवसांत मी घेतलेल्या मुलाखती जेवढ्या अंतर्मुख करून गेल्या तेवढ्या माझ्या सम्पूर्ण कार्यकाळात घडल्याचे मला स्मरत नाही. हे सामाजिक स्थित्यंतर तर नक्कीच पण मला अपेक्षित तसेच समूळ परिवर्तन की… ते आत्ताच नक्की सांगता येणार नाही. कारण…

ब्रेक्झीटचे कवित्व अजून संपलेले नसतांना, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा कुठलाही समन्वयी तोडगा दृष्टीपथात नसतांना, कोव्हीडसाठी लशीकरण सुरु झाले असले तरी त्यातील संदिग्धता चिंतनीय असतांना, खुद्द लोकशाहीच्या धुरिणांसह, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची आणि सामाजिक न्यायाची जबाबदारी असणाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप होत असतांना, बुद्धिवादी साहित्यिक आणि परंपराप्रेमी यांच्यातील वादाची जखम ताजी असतांना आणि दांभिक विरक्तीच्या सात गाद्यांच्या तळाशी प्रच्छन्न आसक्तीचा मोती आपली बोच जाणवून देत असतांना, या साऱ्या जागतिक (आणि आगतिक?) घडामोडींना पुरून उरलेला एकच प्रश्न अवकाश व्यापून राहिलेला दिसतो…

व्हॉट्सॲपचं काय करायचं…?

Image source: https://www.wired.com/story/inside-facebook-mark-zuckerberg-2-years-of-hell/

Collective Wisdom, Et Cetera, Sustainability

विकास…!

सुमारे ६ वर्षांपूर्वी उद्योगांचे सामाजिक दायित्व [Corporate Social Responsibility] हा विषय अभ्यासत असतांना, मानसशास्त्र विषयाच्या एका वर्गात आम्हाला जाणिवांचे संशोधन आणि संज्ञान-विकसन [Cognizance Development] या अंतर्गत एक कृती-कार्यक्रम [Class Activity] दिली होती. यात आम्हाला विविध कृष्णधवल तथा रंगीत छायाचित्रे देण्यात आली आणि त्यातून आम्हाला एक विकास [Development] दर्शविणारे आणि दुसरे ज्यातून विकासाला असणारी आव्हाने [Challenges to Development] प्रतीत होतील अशी दोन प्रातिनिधिक चित्रे निवडण्यास सांगण्यात आली आणि प्रत्येकाने आपापल्या ज्ञान-भान-जाण-जाणिवांना अनुसरून निवड केली.

मी निवडलेली दोन चित्रे अनुक्रमे अशी होती – विकास प्रतीत करणारे मी निवडलेले कृष्णधवल चित्र होते – करड्या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर आपल्याच लयीत संथपणे विहार करणारा पांढराशुभ्र पक्षी आणि विकासाला आव्हान दर्शविणारे माझे रंगीत चित्र होते – यात्रेतला माणसांनी खचाखच भरलेला आणि वेगाने गरगरणारा महाकाय आकाशपाळणा! अर्थातच आमच्या निवडीमागचा आमचा विचार स्पष्ट करण्याचे बंधन आम्हाला होते आणि माझे विवेचन असे होते –

ज्या अवकाशामध्ये प्रत्येक जीव म्हणजे कुठलाही सजीव हा कुठल्याही भीती, दबाव, उपचार तथा गतानुगतिक रूढीग्रस्ततेपासून मुक्त आणि इतर कुणाशीही तुलना किंवा स्पर्धा न करता, संपूर्ण जाणीवेने आपल्या ‘स्वयम्’शी प्रामाणिक राहून आपल्याच विशिष्ट शैलीत स्वच्छंद पण जबाबदार विहार करू शकेल असा कुठलाही अवकाश माझ्या दृष्टीने ‘विकसित’ [Developed] म्हणता येईल आणि तो तसा होण्यास आणि राहण्यास जी रचना अथवा जे प्रारूप [Social Structure] कारणीभूत ठरेल आणि त्या अवकाशाची धारणा करेल तोच विकास [Development]! तपशीलातील बारकाव्यामध्ये, करडी पार्श्वभूमी ही कायमच कुठल्यातरी अनिष्ट, अनीतीचे मळभ भरून राहीलेल्या आभाळाच्या परिस्थितीचे, सभोवतालचे सूचन होते तर पांढराशुभ्र पक्षी हा चिखलात उगविणाऱ्या कमळाचे, निष्कलंक अलांच्छित चारित्र्याचे प्रतिमान म्हणून निवडले होते.

तर यात्रेतील महाकाय, स्वत:च्या अक्षाभोवती भिरभिरणाऱ्या आकाशपाळण्याचे रंगीत चित्र हे आजच्या बहुरंगी, बहुढंगी, चंगळवादी आणि क्षणिक सुखाच्या नादात सतत भिरभिरत राहणाऱ्या अत्याधुनिक जीवनशैलीचे प्रतिबिंब होते. अशा जीवनशैलीच्या मोहात गुंतून पडल्याने, स्वत:भोवती जाळे विणून त्यातच अडकून पडणाऱ्या कोळ्याचे जिणे आपण जगतो आहोत याचेही भान नसल्याने, धावण्यातच कैफ शोधण्याच्या अट्टाहासापायी आपण केवळ गरगर फिरतोय पोहचत कुठेच नाही हे मुळात समजतच नाही आणि समजले तरी उमजायला जो अक्षम्य उशीर होतो – तो जाणीवेचा अभाव, प्रच्छन्न अनास्था हेच खऱ्या, सर्वसमावेशक आणि धारणाक्षम (शाश्वत नव्हे; इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करतांना भाषेचा तर राहू दे साधा अर्थाचा देखील विवेक न बाळगल्याने ‘Sustainable’ चे मराठीकरण ‘शाश्वत’ होते जे फारतर ‘Eternal’ चे ‘मुक्त भाषांतर’ असू शकते, असो!) विकासाला आव्हानं असू शकते.

हा स्वत:च्या नादात, स्वत:च्या वेगात आणि स्वत:च्याच मस्तीत स्वत:भोवतीच गोलगोल फिरणारा, स्वमग्नतेचा प्रतिक असलेला पाळणा क्षणभरसुद्धा थांबविणे महाकठीण तेथे तो उलटा फिरविणे म्हणजे तर काळाचे चक्र मागे फिरविण्याइतके वेडगळपणाचे – दिवास्वप्न किंवा कविकल्पना का म्हणानात! हे माणसानेच माणसाच्या भ्रामक विकासाच्या कल्पनांनी खऱ्या, समग्र विकासापुढे उभे केलेले आव्हान… जे फक्त माणसाच्या संवेदना जाग्या आणि जाणीवा समृद्ध झाल्याशिवाय स्वीकारताही येणार नाही, आधुनिक उपायांनी ते निर्दाळणे तर केवळ अतर्क्य आणि अशक्य!

माझ्या या ‘निरुपणा’शी सहमत होणे तेव्हा देखील तेथील उपस्थितांपैकी कुणालाही अर्थातच जड गेले असणार आणि असल्या कविकल्पनांशी तादाम्य पावण्याइतका अव्यवहारी तात्विक मुर्खपणा करण्यापेक्षा त्या आकाशपाळण्याची, रोमारोमात भिनणारी आणि तनमन धुंद करून टाकणारी, ‘आजकल पांव जमींपर नहीं पडते मेरे…’ अनुभूती देणारी सैर कुणालाही अधिक प्रिय वाटली तर दोष कुणाचा…?

आज हे सारे आठविण्याचे कारण म्हणजे… करोना आणि नववर्ष! करोनाने तो पाळणा काही काळ थांबवला हे तर नक्की. बऱ्याच लोकांना या ‘निष्कर्म कर्मयोगा’च्या काळात अनेक साक्षात्कार झाले, उपरत्या झाल्या आणि हृदयाला वित्त… आपलं रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या संकुचित झाल्यामुळे विरक्तीचे झटकेही आले. एक वेळ अशीही आली की आता हा पाळणा खरोखरीच उलटा फिरायला लागतो की काय अशी शंका येण्याइतपत आध्यात्मिक निरासक्ती आणि संतुलित जीवनाचे महत्व याच्या पर्वतप्राय लाटा उठतांना दिसल्या पण लशीची चाहूल लागताच त्यांना भरतीच्या दुप्पट वेगाने ओहोटीही लागलेली दिसली.

नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि येऊ घातलेल्या लशीच्या भरवशावर बहुतांनी गतसालावर आगपाखड करून घेतली. बऱ्याच लोकांनी Sunday सिनेमातील कथाबीजानुसार गेले वर्ष आपल्या आयुष्यात आलेच नव्हते [Zero Year] असे समजून पुढील मार्गक्रमणा करण्याचा निर्णय घेऊन अत्यंत विद्वत्ताप्रचुर संयमाचे प्रमाण दिले! तर कुणी अजूनही करोनाने दिलेल्या दणक्यातून सावरण्याचा प्रयत्न करता आहेत. काही उदासीन संत प्रभृती या, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे…’ या साक्षीभावाने साऱ्याच घटनाक्रमाकडे निरिच्छ आणि ‘इदं न मम…’ धारणेने पाहता आहेत तर काही होतकरू उद्योजक ‘संधी’चे सोने करण्याच्या उद्योगात मग्न आहेत…

या सगळ्या गोंधळात, करोनाने दिलेले धडे नववर्षाच्या संकल्पांसारखे अल्पजीवी ठरू नये ही अपेक्षा ठेऊन आणि साऱ्याच करोना-योध्यांप्रती कृतज्ञता बाळगून पुन:पुन्हा एकच प्रश्न ‘मना’ला छळत राहतो… पाळणा पुन्हा वेग पकडतोय… यावेळी त्याची गतीही वाढली आणि आकाशाची सफर करण्याची माणसाची लालसाही वाढत राहिली…

तर…?

नववर्षाच्या विवेकपूर्ण शुभेच्छा…!

Et Cetera

प्रगत…!

What is “GNH” explained in 3 min – Inspired by GNHFund.com – Created by MortenSondergaard.com

माणसाच्या ज्ञात इतिहासामध्ये, सर्व लौकिक सुखे, ऐश्वर्य आणि सत्ता पायाशी लोळण घेत असतांना एका राजपुत्राला त्यांचे क्षणभंगुरत्व व त्यातील फोलपणा जाणवल्याने, मानवी जीवनाचे याहून वेगळे, अधिक सखोल प्रयोजन शोधावेसे वाटले आणि सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्त होऊन त्याचा गौतम बुद्ध झाला…

जगज्जेत्या सिकंदर अर्थात अलेक्झांडरला तो मृत्यूशय्येवर असतांना, आपल्या विजिगीषू वृत्ती आणि आयुष्यभराची सत्तालालसा आणि त्यामुळे झालेली अपरिमित हानी निरर्थक आणि व्यर्थ वाटल्याने त्याने आपल्या शवपेटीतून आपले मोकळे, रिकामे हात बाहेर येतील अशी योजना करायला सांगितली…

मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली मनुष्याच्या गरजाधिष्ठित विकासातील मानसशास्त्रीय टप्प्यांची उतरंड ही काहीशी विवादास्पद ठरली असली तरी, आत्मभान तथा आत्मिक, अभौतिक समाधान याला त्याने माणसाच्या विकासाचा उत्कर्षबिंदू अर्थात परमावधी मानणे हे सामान्यत: स्वीकारलेले तथ्य आहे…

मायकेल जॅक्सन या अतिश्रीमंत जगप्रसिद्ध गायक-नर्तकाने, म्हातारा होण्याची कल्पना भयावह वाटत असल्याने शुद्ध प्राणवायूचा अखंडित पुरवठा व्हावा म्हणून रोज ऑक्सीजन चेंबर मध्ये झोपण्याची वंदता असली तरी त्याचे चिरतरुण राहण्याचे स्वप्न आणि अकाली मृत्यू या दोन्ही गोष्टी ढळढळीत सत्य आहेत…

ही माणसाच्या ज्ञात इतिहासातील फक्त काही उदाहरणे आहेत, अशी आणखी कितीतरी देता येतील. मुद्दा असा की सामर्थ्य, सत्ता, संपत्ती याने काही काळ थोडी भौतिक सुखे विकत घेण्याच्या भ्रमात माणूस जगतो पण आंतरिक समाधान या सगळ्या पलीकडे आहे हे समजायला त्याला सहसा खूप ऊशीर होतो.

कळतं पण वळत नाही आणि समजतं पण उमजत नाही अशा या, बाहेर सुख-समाधान शोधण्या मागची जी अनेक कारणे आहेत त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे माणसाची तुलना करण्याची मूलभूत प्रवृत्ती! समूहात राहतांना माणूस अत्यंत स्वाभाविकपणे स्वत:ची दुसऱ्याशी तुलना करू लागला आणि बरोबरीही.

तुलनात्मक निरीक्षण-परीक्षण-विश्लेषण स्वभावत: चूक म्हणता येणार नाही कारण ज्या जिज्ञासू वृत्तीमुळे मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि प्रगत झाला त्याच प्रवृत्तीचे तौलनिक अभ्यास हेही एक परिमाण आहे तेव्हा तुलना ही वस्तुत: वाईट नसून तिला चिकटलेला हेतू हा माणसाच्या विकासाची दिशा ठरवीत असतो.

दुसरी प्रवृत्ती ही आदिम प्रेरणांची. इतर सर्व सजीवांप्रमाणे माणसाला देखील चार आदिम प्रेरणा या निसर्गत: मिळाल्या आहेत आणि ते देखील स्वाभाविक म्हणावे असेच आहे. तथापि या आदिम प्रेरणांवर उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर माणसाने जे जे आधुनिक संस्करण केले त्यात सीमा ओलांडल्या गेल्या.

‘अधिकस्य अधिकम्  फलं…’ या उक्तीच्या भावार्थापेक्षा शब्दार्थ अधिक भावल्याने कायम ‘अधिक’च्या मोहात माणूस असा गुरफटत गेला की आता त्याला कुठे थांबावे हे कळण्याचा विवेकच शिल्लक न राहिल्याने तो एका अंतहीन शर्यतीचा गुलाम झाला आणि लगाम नसलेल्या घोड्यासारखा धावू लागला.

या साऱ्याचा परिणाम म्हणून आज माणसाने इतकी भौतिक प्रगती केली आहे की चमत्कार वाटाव्या अशा गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाने शक्य होतात. दुसऱ्या ग्रहाचा प्रवास करता येणे, एका ठिकाणी बसून जगातल्या कुठल्याही भागावर नियंत्रण ठेवता येणे, हव्या तेव्हा हव्या तशा वस्तु बनवता येणे, ही काही उदाहरणे…

हे सारे असले तरी यात दोन मुख्य अडचणी आहेत – आधुनिक तंत्रज्ञानाचे चमत्कार अगदी मूठभर निवडक लोकांना उपलब्ध असल्याने त्यांच्यातील आणि बहुसंख्यातील दरी आणि परिणामी सामाजिक विषमता वाढत जाते हे एक आणि दुसरे म्हणजे, एवढे सारे करूनही ‘आहे रे’ वर्गाला समाधान नाही!

हा तिढा सुटण्यासाठी एका अशा समाजाची गरज आहे ज्यात मनुष्यसमूह अनास्थेपेक्षा [Apathy] समानुभूतीला [Empathy] अग्रक्रम देईल; आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावर, ओंजळ भरल्यावर अधिकचे उधळून मातीत सांडण्याऐवजी, ज्याच्या मूलभूत गरजाही अपुऱ्या आहेत त्याचा विचार करेल.

पण हे साधणे सहजी शक्य नाही कारण वर्षानुवर्षांच्या अनुकूलनाने [Conditioning] ‘आजची जीवनशैली, आचार-विचार, सामाजिक स्थिती ही स्वाभाविकच आहे, त्यात काहीच गैर नाही’ अशी धारणा, विशेषत: ‘आहे रे’ वर्गाची मानसिकता बघता, दृढ झालेली आढळते जी मुळापासून बदलायला लागेल.

यासाठी पुढच्या पिढीची घडण मूळापासून वेगळी असावी लागेल आणि ते साधण्यासाठी आजच्या पिढीला आपल्या धारणांमध्ये अमूलाग्र बदल करावा लागेल – विकारांची जागा विवेकाला, विखारांची जागा विचाराला आणि आत्मकेंद्रीततेची जागा आत्मभान-समाजभान-सहवेदना आणि जाणिवेला घ्यावी लागेल.

सारे काही परिवर्तनशील आहे आणि व्यक्ति, सृष्टि, समष्टि सारे एका वर्तुळाकार व्यवस्थेचे घटक आहेत, रेषीय व्यवस्थेचे नाही या दोन मूलभूत सिद्धांतांवर सर्व नियोजन बेतल्यास आणि समाजातील सर्व थरातील साऱ्या मनुष्यसमूहांचा सक्रिय सहभाग लाभल्यास, हे समूळ समग्र सामाजिक परिवर्तन शक्य आहे.

असे अपेक्षित समग्र सामाजिक परिवर्तन घडले आणि एका नव-मूल्यव्यवस्थेवर आधारित एक संतुलित, समभावी आणि संवेदनशील समाज प्रस्थापित झाला हे कसे समजावे? अशा मानवसमूहाची ओळख कशी पटावी, कस कसा लागावा याची काही लक्षणे सांगता येतील का ते देखील पाहू या.

एका समृद्ध, सुशिक्षित, सुसंस्कृत तथा संवेदनशील प्रगत मानवी समूहाची व्यवच्छेदक लक्षणे :

  • समाजात सगळ्यात जास्त मान व प्रतिष्ठा शिक्षकांना लाभणे.
  • शिक्षकांइतकाच मान व प्रतिष्ठा संशोधक-साहित्यिक-कलावंत-विचारवंतांना मिळणे.
  • बुद्धिजीवी वर्गाइतकी समान वागणूक शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मिळणे, श्रमाला प्रतिष्ठा असणे.
  • सर्वांना शिकण्याची समान संधी उपलब्ध असणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळणे.
  • वाहतुकीमध्ये पादचारी, दुचाकी, सार्वजनिक वाहने व खाजगी वाहने असा प्राधान्यक्रम आणि सामुदायिक व्यवहारांमध्ये मुले, स्त्रिया, ज्येष्ठ, असाधारण व्यक्ती यांच्याप्रती सौजन्य बाळगणे.
  • सार्वजनिक ठिकाणी आपल्यामुळे इतर कुणालाही कसलाही त्रास होईल असे वर्तन न करणे.
  • अध्यात्मिक उपक्रमांसह, आपल्या श्रद्धा, धार्मिक धारणा व तत्संबधी आचार-विचार, रीती-रिवाज, प्रथा-उपचार ही आपली खाजगी बाब असल्याने ती आपापल्या घराच्या मर्यादेत पाळणे व त्याचा जाहीर पुरस्कार न करण्याचे समस्त नागरिकांस भान असणे व सार्वजनिक ठिकाणी संयत, सुसंस्कृत वागण्याची आचारसंहिता कसोशीने पाळणे.
  • जल, वायू, ध्वनि, विचार यासह साऱ्याच गोष्टींचे प्रदूषण निग्रहपूर्वक टाळणे व आपला सभोवताल सर्व प्रकारे स्वच्छ, निर्मळ आणि उल्हसित राहील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. 
  • समस्त नागरिकांनी आपली सर्व विहित कर्तव्ये व वैयक्तिक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडणे तसेच आपल्या हक्क व अधिकारांबाबत सदैव जागरूक असणे.
  • सर्व सामूहिक जबाबदाऱ्यांचे न्याय्य वाटप करून समाजातील सर्व घटकांना समान अधिकार व किमान सामाजिक सुरक्षा, सन्मानाने जगण्याची सामाजिक व्यवस्था असणे.
  • सांस्कृतिक अधिष्ठाने आणि व्यासपीठे सर्वसमावेशक तथा लोकाभिमुख असणे तसेच त्यांना राजाश्रय असणे आणि त्यांच्या निरंतर उत्कर्षासाठी समाजाने सर्वतोपरी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करणे.      
  • उद्योगांनी राजाश्रयाशिवाय स्वयंपूर्ण व समाजोपयोगी असणे आणि आपल्या सामाजिक जबाबदारीचे सदोदित भान राखूनच आपली व्यवसायविषयक व इतर धोरणे आखणे. 
  • कुणाचीही कुठल्याही प्रकारची हानी/शोषण होणार नाही इतपतच नफा कमविण्याची उद्योग-व्यवसायांना मुभा असणे व सर्वच व्यवहारांना आर्थिक नियमनाची चौकट असणे.  
  • शासन प्रशासन यांच्या धोरणात्मक नितीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व जीवनशैलीत मागास समाजघटकांस प्राधान्य व सवलतींचा आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार असणे व दैनंदिन घडामोडींमध्ये एकवाक्यता तथा प्रतिसादी तत्परता असणे.
  • प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसादावर, विरोधापेक्षा सहभागावर, नियंत्रणापेक्षा संस्करणावर, विकारापेक्षा विचारावर, कर्मठतेपेक्षा विवेकावर आणि द्वेषापेक्षा सहवेदनेवर भर देणारे समाजमन घडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी मूलभूत प्रेरणा व धोरण असणे.

या दृष्टीने प्रगती करण्यासाठी कुठल्याही मनुष्य समूहास खालील अग्रक्रम ठरवावे लागतील –

  • निसर्गस्नेही जीवनशैली आणि सर्वसमावेशक विकासाबरोबर सात्विक संस्कार देणारी मूल्यव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अपेक्षित आदर्श प्रारूप तयार करून प्रचलित करणे.
  • शिक्षण नितीमध्ये केवळ ज्ञान-कला-कौशल्य यांचे फक्त संस्करण नव्हे तर स्वावलंबनासाठी त्यांचे सुयोग्य उपयोजन करण्याचे जीवन-शिक्षण आणि सर्वसमावेशक समाजभान असलेल्या मानवी मूल्यांचे जतन-संवर्धन होईल असे धोरणात्मक प्रयोजन असणे.
  • कुठलाही समाजघटक कुठल्याही प्रकारच्या खाजगी वर्तणूक अथवा सार्वजनिक व्यवहारांमध्ये इतरांवर शिरजोर होऊन आपल्या पद-प्रतिष्ठा-सत्ता यांचा दुरुपयोग करू शकणार नाही अशी धारणाक्षम, गतिमान तथा संतुलित नियमन चौकट, सामाजिक नियंत्रण व्यवस्था असणे.

हे काम एकट्या-दुकट्याचे नाही, एका विशिष्ट समाजाचे किंवा प्रदेशाचे नाही, काही दिवस किंवा महिन्यांचे नाही तसेच फक्त समाजधुरीण, शिक्षक, नेते यांचेही नाही कारण हे समूळ, समग्र परिवर्तन सर्वसमावेशक, सर्वव्यापी आणि सर्वत्र असल्याने त्याची पालखी वाहण्यासाठी साऱ्यांचेच खांदे लागतील. इथे ‘अधिकस्य अधिकम् फलं …’ तंतोतंत लागू पडते!

शुभम भवतु !

Et Cetera

New Normal…?

I am feeling like winning a lottery of 1 Crore without even buying a lottery ticket and although it sounds too good to be true with a professional info-graphic presentation, it is another Master-stroke that has left the critics dumbstruck who are struggling to find a flaw in it except for the usual one – ‘It is good on the paper but let us wait for its implementation; we neither have the infrastructure nor the budget to support such a profound vision!’

Continue reading “New Normal…?”

Et Cetera

होमो सेपियन…?

चतुष्पादापासून द्विपाद होत टोळ्यांनी मुक्त संचार करून अवघी पृथ्वी पादाक्रांत करीत…

जमिनीशी ‘ताठ’रपणे वागू शकल्याने ‘विकसित’ झालेल्या मेंदूचा ‘यथोचित’ वापर करीत…

अश्म, पाषाण, हिम आणि लोह युगांच्या वेळोवेळी धडकलेल्या आव्हानांवर स्वार होऊन…

वसाहतीपासून यंत्रयुगापर्यंत आणि गुहा-लेण्यातील चित्रलिपीपासून विचित्र भाषा-चिन्हांच्या उपयोजनापर्यंत…

उष्णतेने पाण्याच्या होणाऱ्या वाफेच्या शक्तीपासून तोंडाच्या वाफेने उष्णता निर्माण करणाऱ्या भक्तीपर्यंत…

शिक्षण नावाच्या कारखान्यातून निर्माण होणाऱ्या घडीव यंत्रांपासून दुनिया मुठ्ठीमें ठेवण्याच्या तंत्रांपर्यंत…

गणिती सूत्रापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आणि बिगडाटा, ब्लॉकचेन ते बीटकॉईनच्या घातसूत्रापर्यंत…

प्रवास करून ‘प्रगत’ झालेल्या आणि आता…

पुन्हा चिन्हांच्या अपभ्रंशीत भाषेत बोलणाऱ्या, मेंदू गहाण ठेवून विवेक-विचाराला श्रद्धांजली वाहणाऱ्या…

दोन लाख वर्षांच्या प्रवासाची फलश्रुती म्हणून कमावलेल्या ‘सिव्हीलाईज्ड स्टेट्स’ला तिलांजली देणाऱ्या…

पाठीचा ताठ कणा पुन्हा आडवा करून चतुष्पादाच्याही मागच्या श्रेणीवर जाऊन सरपटणाऱ्या प्राण्याला…

एका विषाणूच्या उद्रेकाने उत्क्रांती आणि सुसंस्कृतेचा प्रदीर्घ, समृद्ध प्रवास क्षणात भोगदायी करणाऱ्या…

‘होमो सेपियन’ अर्थात ‘शहाण्या मानवा’ने स्वत:ला एकच प्रश्न विचारायचा आहे…

ये कहां आ गये हम…?

Image Courtesy [Photograph]: Sebastian Willnow/AFP/Getty Images

 

Et Cetera

Signs…!

Some signs I would like to see put up at some visible places sooner than later…

At Hill station, Weekend Getaways and Picnic Spots –

“We sell pictures of Sunset and Clouds,
don’t be ‘Selfi’-sh; enjoy the moment!”*

At a Restaurant, Joint and Meeting Point…

“We do not have Wi-Fi, talk to each other…!”

At a Library…

“Google doesn’t really know it all,
after all we invented Google!”*

On any Social Media Platform…

“Man is a Social Animal doesn’t mean a Social Media Monster!”*

“Facebook, WhatsApp and YouTube are not Institutions;
just platforms to exchange information as in a Trade!”*

At all public places…

“Better B-E-H-A-V-E yourself;
We are Homo sapiens that have surpassed five other sapiens and
are believed to be E-V-O-L-V-E-D!”*

“We have Only One Livable Planet and You have Only One Life…
Use both conscientiously!”*

Anywhere and Everywhere…

“Schooling, Grooming and Growing are mandatory;
Education, Manners and Growth are optional…!”*

“We are here to coexist and not compete…!”*

*Original content, copying without written permission and/or due credit may amount to plagiarism.
Et Cetera

उसंत…!

मजबूत शरीरयष्टीचा तो लाकुडतोड्या गावात पोहचला तेव्हा वखारीचा मालक त्याला पाहून खूष झाला. त्याने लाकूडतोड्याला अतिशय आरामदायी रहाण्याची जागा, चांगले कपडेलत्ते आणि अगदी उत्तम वेतन देऊ केले आणि उत्कृष्ट साधनांचीही कमतरता नसल्याने लाकुडतोडयाने मन लावून काम करायचे ठरवले.

Continue reading “उसंत…!”

Et Cetera

संधी…!

गोष्ट जुनीच आहे… बहुदा सगळ्यांनीच ऐकलेली, पण पुन्हा एकदा.

पादत्राणे बनविणाऱ्या एका कंपनीने आपल्या दोन विक्रेत्यांना आफ्रिकेला पाठवले बाजार सर्वेक्षण करायला.

पहिला पूर्व किनाऱ्याला गेलेला म्हणाला, ‘इथे आपली उत्पादने निरुपयोगी आहेत, कुणीच पादत्राणे वापरीत नाही, आपण पादत्राणे विकणार कुणाला?’

दुसरा पश्चिम किनाऱ्याला गेलेला म्हणाला, ‘इथे आपल्याला व्यवसाय वाढवायला खूपच संधी आहे. कुणीच पादत्राणे वापरीत नसल्याने सारेच संभाव्य ग्राहक आहेत आणि स्पर्धा शून्य…!’


पहिला – ‘अरे देवा, एवढ्या सुंदर सुगंधित गुलाबांना काटे का असतात?’

दुसरा – ‘अरे वा, काय निसर्गाचा चमत्कार आहे, एवढ्या काट्यांमध्ये किती सुंदर गुलाब!’

परिस्थितीत काहीही फरक नाही… आणि वस्तुस्थितीतही!

फरक फक्त दृष्टीकोनाचा!

सांगा कसं जगायचं?

कण्हत कण्हत की गाणं म्हणत…?

लॉकडाऊन ही संधी आहे की समस्या… तुम्हीच ठरवा!


 

Et Cetera

निर्वाह…!

नाव छोट्याशा गावाच्या किनाऱ्याला लागली. गावकरी उतरले, एक शहरी बाबूही उतरला. त्याने बघितले जवळच एक छोटीशी होडी पाण्यावर डोलते आहे. होडीत निवांत पहुडलेल्या गावकऱ्याने मासेमारी केली आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाचे ताजे मासे जमा केले आहेत. पण ते अगदीच थोडेशे आहेत, विकून फार काही कमवता येईल असे नाही. शहरी बाबू गावकऱ्याकडे गेला, म्हणाला, ‘दादा, मासे तर खूपच चांगले मिळाले की हो!’

Continue reading “निर्वाह…!”

Et Cetera

उमेद…!

आज जगाला भेडसावणाऱ्या करोना विषाणूच्या भीती संदर्भात काल माझ्या इत्यादी ब्लॉगवर ‘इष्टापत्ती‘ या पोस्टद्वारे मी कास्ट अवे या हॉलीवूडच्या चित्रपटाची मीमांसा केली. ते लिखाण म्हणजे या विषयाचा उपोद्घात होता असे मानले तर आजचा हा लेख उपसंहार आहे असे मानायला हरकत नाही. तर पुढे…

Continue reading “उमेद…!”

Et Cetera

Quality Time…!

The recent outbreak of COVID-19 might have created a panic of a pandemic; it also resulted in a family staying together at home that otherwise keeps busy with their respective obligations like school, college, work and other social activities. While all are at home in a situation that seems like a house arrest, many who are not used to stay at home during a day time might find it difficult to put it to good use. Here’s something that can offer you enough creativity to have Quality Time with your loved ones. Try it for yourselves and thanks Corona Virus for introducing you to pure pleasure that you never thought exists within your own space with all your dear ones who love you unconditionally!

Et Cetera

Vow…!

With about 100 legitimate, righteous and completely constitutional amendments, today our Constitution completes a glorious journey of 70 Years. It is really high time we must revisit our Constitution and understand its significance in the wake of current events.

The Constitution of India (Bhāratīya Saṃvidhāna) is the supreme law of India. The document lays down the framework demarcating fundamental political code, structure, procedures, powers, and duties of government institutions and sets out fundamental rights, directive principles, and the duties of citizens. IT IS THE LONGEST WRITTEN CONSTITUTION OF ANY COUNTRY ON EARTH.

Continue reading “Vow…!”

Et Cetera

SOUL*

As it dawns on the Third Decade of the New Millennium,
World has seen enough…
Pride
Greed
Lust
Envy
Gluttony
Wrath and
Sloth…

It’s high time this AI-enabled Ultramodern Digitally powered
World sees more of…
Humility,
Charity,
Chastity,
Gratitude,
Temperance
Patience and
Diligence…

This transformation is possible only with one condition – Unconditional Love! The picture above is the Symbol of Unconditional Love and it should replace every other symbol till the moment when sanity, peace and happiness prevails on this land… Until then, thinking of a Happy New Year is futile, let alone wishing or celebrating it!

A Long Way to go…

*Symbol of Unconditional Love [No Conditions Apply]

Et Cetera

Blueprint…?

It’s been exactly 70 years our Constitution has been drafted on this day, how far have we come… along it or from it?

Our Constitution, regarded as a Holy Document and presumed to be the Blueprint of Modern India, came into existence exactly 70 Years ago. Don’t we need to revisit it to find some sensible insights in view of the shameless, indecent and disgusting politics happening around that has taken ‘We the People…’ for granted?

On this 70th Constitution Day let us reflect on where we came from and where are we leading to… and if that doesn’t seem to be the destination, let us resolve to change our path…!

Et Cetera

Child-in-you…!

A child sees the world in full color… as it really is.

Adult see the world in Black and White… as profit and loss.

A child sees the earth as green… of the vegetation it produces.

Adult see the earth as green… the currency it can make as land.

A child sees the SUN as a beautiful source of… light that glows the world.

Adult see the SUN as an eternal source of infinite… energy to blow the world.

A Child sees a home as a dwelling for living beings to live… together and happy.

Adult see a home as a bunker for seclusion from others… for I, Me and Myself.

That’s why I have to say this today that…

Life was great until they replaced my crayons with the calculator…!

I am sorry I refused to become an Adult…

I still love my crayons and see the world in all shades and colors…

I still want to live together with everybody in peace and enjoy this planet’s offerings…

May it be Sun, Moon, River, Mountain, Trees, Birds and Animals…
I want all of us to be a big family…

IF you also can draw such a vibrant picture still,
Congratulations!
The child in you has survived…!

Happy Children’s Day and
Never Ever Let That Child in You
to sit still focusing on a calculator!

Et Cetera, Sustainability

SimpliCITY…!

If you are an urbanite enjoying a luxurious life, THIS message is particularly for YOU! You must have heard an idiom, ‘The bottom is all very crowded but there’s always room at the top…’ In this case that room at the top – in the mountains – is made to face the music because of the crowd in the streets of a town or city.

On the 150th Birth Anniversary of Mahatma Gandhi, let us reflect on one of the primary principles of wholesome life he tried to inculcate in the people… Simple Living! Please start Living Simply yourself in this moment of realization and like, share and join #ilivesimply-movement.

Visit http://hial.edu.in/ilivesimply-movement/ to find out the ways you can participate in it.

“If you want to go Fast,
Go Alone…
If you want to go Far,
Go Together.”
Similarly
If you want to live Short,
Live Luxurious…
If you want to live Long,
Live SIMPLE!

Inclusive Sustainable Development doesn’t get any simpler, by the way… Way to go!

Et Cetera

कोSहम…!

आत्मशोधाची प्रक्रिया, कोSहमचे उत्तर शोधणे आपण समजतो तसे नसते, असू शकत नाही. माझ्यातला मी म्हणजे काही ‘माझी दहाची नोट…’ नव्हे जी मागच्या दिवाळीला घातलेल्या ठेवणीतल्या कुर्त्याच्या खिशात राहून जावी. बरे, मी हरवलो आहे का? तर कुठेतरी ठेवली गेली असायला व्यक्ती म्हणजे काही किल्ली नव्हे आणि ‘आपण यांना पाहिलंत का?’ मध्ये फोटो झळकावा अशा अर्थानेही आपण काही खरतर हरवलेले नसतो. खरा, माझ्या मूळच्या स्वरूपातला मी हा आत खोल असतोच. पण लहानपणापासून इतरांची माझ्याबद्दलची मतं, त्यातून मी काढलेले चुकीचे निष्कर्ष आणि माझ्या पक्क्या झालेल्या किंवा करवून दिल्या गेलेल्या धारणा, माझ्यावर घडलेले संस्कार यांच्या ढिगाऱ्याखाली मी गाडलेला असतो. त्यामुळे आत्मशोध म्हणजे खरतर हा ढिगारा उपसून काढणे आणि त्याच्याखाली, आत, खोल कुचंबलेल्या स्वत:पर्यंत पोहचणे. चुकीच्या धारणा, प्रसंगोपात संस्कार आणि अनावश्यक ज्ञान खोडून काढून मूळ मानसावर जगाने ओतलेला ढिगारा उपसून हे आठवणे की हे सर्व घडण्यापूर्वी तुम्ही कोण होतात… म्हणजे आत्मशोध!

Continue reading “कोSहम…!”

Et Cetera

दश-हरा…!

आज विजयादशमी, दसरा – दीपावली नामे तेजाच्या उत्सवाचे पहिले पाऊल! महिषासुरमर्दीनीने असुराचा, रामाने रावणाचा वध केला, पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली आपापली शस्त्रे पुन्हा धारण केली आणि कौत्साने आपले गुरु वरतंतू यांच्या गुरुदक्षिणेच्या अपेक्षेची पूर्तता केली अशा विविध धार्मिक, पौराणिक, अलौकिक धारणांचा संदर्भ असलेला, हिंदू मान्यतेनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी, एक मुहूर्त!

Continue reading “दश-हरा…!”

Et Cetera

उबुंतू…!

माझी या ब्लॉगवरील ही शतकोत्तरी पहिली पोस्ट अर्थात पोस्ट क्रमांक १०१ कुठल्या विषयावर असावी याचा विचार करतांना मला जाणवले की गेले काही दिवस, मुलांच्या समग्र व्यक्तिमत्व विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पांसंबंधी माझी अनेक शिक्षणतज्ञ, प्रायोगिक शिक्षणकर्मी, तर्कनिष्ठ विज्ञान शिक्षक, सूज्ञ पालक आणि समविचारी, समानधर्मी समाजचिंतक, प्रायोजक यांच्याशी जी सर्वंकष चर्चा घडते आहे त्या पार्श्वभूमीवर आणि ‘संपूर्ण समाज परिवर्तना’च्या माझ्या संकल्पनेची सुरवात, ‘शिक्षण प्रक्रियेकडे एका सर्वस्वी भिन्न परिप्रेक्ष्यातून पाहणे’ या पायरीवर पाय ठेवल्याशिवाय होऊ शकत नाही या धारणेस सुसूत्र मांडणीचा आयाम देण्यासाठी, ही पोस्ट, मी अलीकडेच शिक्षकांसाठीच्या एका समुपदेशन कार्यशाळेच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेल्या संवादासाठी खर्ची घातल्यास ते समर्पक तथा सयुक्तिक व प्रसंगोचित ठरावे…

Continue reading “उबुंतू…!”

Et Cetera

अन्वयार्थ…!

जगाच्या आर्थिक उत्क्रांतीची आणि पर्यायाने माणसाच्या उपभोग्यतेची परिसीमा मानली जाणारे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या मनुष्य व्यवहाराच्या परस्परपूरक आधुनिक आयामाने माणसाचा ग्राहक झाला… खरतर ‘उपभोक्ता’ झाला असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरावे! समृद्ध मानवी मूल्यांची जागा क्षुद्र बाजारमूल्यांनी घेतली आणि माणसाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत साऱ्याचाच बाजार झाला. नव्हे, जन्माआधीपासून म्हणजे अगदी डोहाळे लागण्यापासून तर मृत्युपश्चात अगदी पुनर्जन्मापर्यंत, साऱ्याच सामान्य नैसर्गिक घटनांचे आधी ‘डेव्हलपमेंट’ आणि यथावकाश ‘इव्हेंट’ झाले आणि इव्हेंट हे जेवढे साजरे करण्यासाठी असतात तेवढेच ‘मॅनेज’ करण्यासाठीही. आज ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ हा मोठाच व्यवसाय आहे, किंबहुना हा एकच प्रचलित व्यवसाय आहे ज्याच्या अनेक उपशाखा आणि पाळेमुळे आहेत. तो कधी शिक्षणाच्या आवरणात येतो, कधी खेळांच्या मैदानावर धुरळा उडवतो, कधी वैद्यकातही डायग्नोस होतो तर कधी राजकारण म्हणून लोकशाही मार्गाने आपली धोरणे राबवितांना सापडतो.

Continue reading “अन्वयार्थ…!”

Et Cetera

Meditation…!

‘We are living in interesting times, may be, and have abundance of everything around us, for sure, however the social disparity is evident and personal imbalance is omnipresent’ this hypothesis proved to be so true with overwhelming response of Senior Citizens to an introductory session of ‘Memory and Meditation’ by Manoj Gokhale that we organized yesterday. This underlined Robin Sharma’s recent quote, ‘Tranquility is New Luxury…’ Everybody seems to have plenty of everything except quality time, pure joy and peace of mind!

Way to go…

IMG-20190618-WA0010

IMG_20190617_163602

IMG_20190617_160957

Et Cetera

क्षमस्व…!

ही पोस्ट मराठीत लिहावी की इंग्रजीत या दुविधेत मी होतो. केवळ भाषेच्या मर्यादेमुळे जागतिक दर्जाच्या अभिव्यक्ती (पहा: १८५६ पासून मराठीचा मानबिंदू असलेले सांस्कृतिक साप्ताहिक ‘भावविलास’, १७५८, सदाशिव पेठ, पुणे) स्थानिकच राहिल्याची उदाहरणे अधिक आहेत. तथापि अगदी अभावाने का होईना, अभिजात प्रकटनाचे आपोआपच जागतीकरण होते, अगदी ते पुणेरी नसले तरी, या विश्वासावर; भाषाभिमानी ओजस्वी पुण्यात ८०% जनता (पुणेकर जरी स्वत:ला ‘रिस्पॉन्सिबल सिटीझन’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत असले तरी निम्म्या पुणेकरांनी ते सामान्य भारतीय ‘जनता’च आहेत हे नुकतेच सिद्ध केलेय, पण या प्रकटनाचा विषयच तो असल्याने ते ओघाने येईलच…) मराठी भाषिक असल्याने आणि ‘कानपिचक्या’ आणि ‘शाल-जोडीतले’ या दोन्ही खास मराठी अवतरणांना इंग्रजीच काय जगातल्या कुठल्याही लेखी, बोली भाषेत किंवा देहबोलीतही सटीक पर्याय नसल्याने मराठीवर शिक्कामोर्तब झाले. आता फक्त या प्रकटनाच्या अभिजाततेमुळे (पुणेरी आत्मविश्वास!) ते जागतिक (आगतिक नव्हे) होण्याची प्रतिक्षा…!

Continue reading “क्षमस्व…!”

Et Cetera

चैत्र शुद्ध प्रतिपदा

आज अगदी पहाटेपासून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शुभेच्छा संदेशांचा पाऊस पडला. माणसाने केलेल्या अफाट आणि बेसुमार ‘प्रगती’स जमेस धरूनही माणसाचे ‘माये’शी असलेले नाते किती दृढ आहे हे ‘आभासी’ जगात राहून ‘प्रकटण्या’च्या त्याच्या अद्भुत कौशाल्यावरून सहज लक्षात यावे! सूज्ञास अधिक सांगणे न लगे तथापि इतरांसाठी हिंट – मायावी, आभासी जगात प्रकटणे – व्हर्च्यूअल रीऐलीटी अर्थात फेसबुक, व्हॉटसएपवर अंगठे दाखविणे. ‘जमाना बदल गया है मां जी…’ हे खरेच! आम्ही लहान असतांना अंगठा दाखविण्याचा अर्थ ‘ठेंगा’ म्हणजे आजच्या लोकप्रिय हजरजबाबी ‘सेन्स-ऑफ-ह्युमर’वाल्या भाषेत ‘बाबाजीका ठुल्लू…!’ असो.

Continue reading “चैत्र शुद्ध प्रतिपदा”

Et Cetera

April…?

In the advent of Social Media with 4G connectivity, it has become a culture of doing little and exaggerating much by making an event of anything – from a routine ritual to a reflex action! CSR is one such thing that is discussed, deliberated and devised more and learnt, understood and practiced very little in letter and spirit throughout its forming years as it completes 5 years of being in force today.

Continue reading “April…?”

Et Cetera

Rang De…!

 

Sir Winston Leonard Spencer-Churchill, Prime Minister of Britain for two full terms (1940 to 1945 and 1951 to 1955), the man behind the victory of England in the Second World War and a noted Writer-Politician had a peculiar political view of India, in general and India’s Independence, in particular, it is believed. There is a very (in)famous ‘prophecy’ attributed to him that is (cheap) popular for its malicious (and fabricated) content rather than its candid (and visionary) intent with expletives that are neither authentic part of his speech nor could be found in any of the official record of Speeches or Letters by him to anybody, let alone to Mahatma Gandhi!

Continue reading “Rang De…!”

Collective Wisdom, Et Cetera, NGO and CSR, Sustainability

March…!

Chief Election Commissioner of India Sunil Arora announced the Schedule of Lok Sabha Election 2019, according to which polling for electing 552 Members of Parliament as People’s Representative to constitute the 17th Lok Sabha will commence on 11th of April and results would be declared on 23rd of May 2019. It’s exactly one month to go and a lot can happen in this decisive month that could be the longest one in the history of Independent India! With the Code-of-conduct in effect, political parties will take their respective courses to make most of it in their own shrewd ways that they have mastered throughout the years of independence. And what should WE do, except for checking out the dates of polling in our constituency and plan a holiday around those, that is? No, I am not going to sermon about the value of our vote and all that, because if we don’t make it our highest priority to choose what we and our future generations should get, or left with, to be precise, why I, or anyone else, should care? I am assuming that the largest democracy of the world has evolved enough to understand the value of a vote and making most of it; if it hasn’t, it doesn’t deserve to be a Democracy in first place. Period!

Continue reading “March…!”

Et Cetera

Voice…!

“Only a society that seeks to include all its people in the economy can succeed in the long term…”

All the national newspapers talking about recent inequality report [Read HERE] by Oxfam and also trying to spread awareness about ‘voting’ in elections of the largest democracy of the world, it becomes imperative to reflect on few facts and try to make some sense of those in the new light!

Continue reading “Voice…!”

Et Cetera

Quest…!

Child is the father of the Man in more than one sense… the best being its uncorrupted mind and unintentional creativity with which it can think of thousands of possibilities without prejudice or vested interests. I love to reiterate an incidence narrated by a School Teacher in this regard and whether it is a real incidence, based on a true story or a complete  work of fiction, I am not bothered as the message is prominent, powerful and forces one to reflect on the situation of our education systems that governs the child psychology or entire ‘developmental’ psychology for that matter!

Continue reading “Quest…!”

Et Cetera

Masterstroke…!

Although ‘Quota’ systems that favored certain castes and communities were in place even in the pre-independence era of British India, ‘Reservation’ in India dates back to the period of Rajarshi Chatrapati Shahu – Maharaj of Princely State of Kolhapur in Maharashtra. Impressed by the initiatives of Mahatma Jyotiba Phule and works of Dr. Babasaheb Ambedkar, His Majesty himself being a generous and democratic ruler, Shahu Maharaj introduced first of its kind Reservation favoring non-Brahmin and backward classes in a pursuit of making a class-free India and abolish untouchability. His 1902 measures resulted into 50% Reservation for backward communities by providing them free education, opening hostels to facilitate their education and also developed societal structures to provide suitable employment to the educated class.

Continue reading “Masterstroke…!”

Et Cetera

नववर्षाभिनंदन!

कुणालाही कमी लेखू नये, मानू नये लहान,
एकत्र येता सानथोर कार्य साकारते महान.
पळांच्या होता घटिका, घटिकांचे दिसमास,
साऱ्यांच्या एकजूटीने पालटते वर्षाचे पान!

Continue reading “नववर्षाभिनंदन!”

Et Cetera

Bharat…!

Disagreement is the essence of democracy but being dreadful is its descent. In any democracy, in general, it is imperative to have a Constitution, learn to honor it by wearing its principles on sleeve and in a nation as vast as India with a ‘rich and varied heritage’, it becomes vital to practice what we ‘pledge’. In the atmosphere that is polluted with debates and protest on the issues that have only political implications and the real issues at ground zero are being camouflaged, democracy suffocates.

Continue reading “Bharat…!”

Et Cetera, Sustainability

खरी कमाई!

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, पुणे येथे काल भारतीय विचार साधना आयोजित विचार भारती साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘साहित्यातून संघर्षाकडे की सुसंवादाकडे?’ या विषयावर घडलेला परिसंवाद ही पर्वणीच ठरली असली तरी उद्घाटन सोहळ्यातील मान्यवरांचे विषय सूत्राविषयीचे भाष्य जेवढे उद्बोधक तेवढेच मार्मिक होते. त्यातीलही विशेष उल्लेखनीय म्हणजे ज्येष्ठ पत्रकार विचारवंत श्री. विजय कुवळेकर यांनी विविध उदाहरणे, किस्से आणि प्रसंग यांच्या माध्यमातून, आधी सुस्पष्ट विचार त्यानंतर संवादी, शुद्ध भाषा आणि त्यायोगे निर्माण होणारी, वर्धिष्णू राहणारी संस्कृती याचे उत्तमोत्तम दाखले देतांना, आजच्या विचार-विवेक-भाषा-संस्कृतीप्रति अक्षम्य, सर्वव्यापी अनास्थेबद्दल व्यक्त केलेली खंत जेवढी चिंतनीय तेवढीच गर्हणीय!

Continue reading “खरी कमाई!”

Et Cetera

बदल आणि बदली…!

‘द ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड’ असे सार्थ बिरूद मिरविणाऱ्या आणि हिंदी चित्रपट इतिहासातील एक सुवर्णाध्याय ठरलेल्या ‘शोले’ या चित्रपटात अनेक वैशिष्ट्यपूर्ण पात्रे आणि जोड्या होत्या – जय-विरू, ठाकूर-गब्बर, बसंती-धन्नो, सांबा-कालिया इत्यादी. यातच आणखी एका वैचित्र्यपूर्ण जोडीची भर घातली ती जेलर आणि हरिराम न्हाई यांच्या परस्परपूरक युतीने. आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने अनेक भूमिका अजरामर करणाऱ्या असरानी या हरहुन्नरी कलाकाराने त्याच्या वाट्याला आलेल्या या अतिशय छोटेखानी भूमिकेत अक्षरश: जीव ओतला. या पात्राचा तकिया कलाम असलेले वाक्य, ‘हम अंग्रेजोंके जमानेके जेलर है, अरे अगर हम नही सुधर सके तो तुम क्या सुधरोगे…?’ हे चित्रपटात विनोदनिर्मितीसाठी वापरले असले आणि, सुरमा भोपालीच्या भूमिकेतील जगदीप आणि हरिरामच्या भूमिकेतील केस्टो मुखर्जी या अनुभवी, दिग्गज विनोदविरांशी तुलना होणे क्रमप्राप्तच असले, तरी असरानीने हा ‘अंग्रेजोंके जमानेका जेलर’ अविस्मरणीय करण्यात कुठलीही कसर ठेवली नाही.

Continue reading “बदल आणि बदली…!”

Et Cetera

जलाओ दिये पर…

जलाओ दिये पर रहे ध्यान इतना
अँधेरा धरा पर कहीं रह न जाए

नई ज्योति के धर नये पंख झिलमिल,
उड़े मर्त्य मिट्टी गगन-स्वर्ग छू ले,
लगे रोशनी की झड़ी झूम ऐसी,
निशा की गली में तिमिर राह भूले,
खुले मुक्ति का वह किरण-द्वार जगमग,
उषा जा न पाए, निशा आ ना पाए।

Continue reading “जलाओ दिये पर…”

Et Cetera

शुभारंभ!

साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि साहित्यिक हे समाजमन आणि संस्कृतीचे शिल्पकार असतात या धारणेनुसार असे म्हणता येईल की साहित्यक्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिबिंब यथावकाश समाजात पडणे ही अपेक्षा स्वाभाविक असण्यास प्रत्यवाय नसावा. म्हणूनच साहित्यात जेव्हा काही आशादायक व उत्साहवर्धक घडते तेव्हा मरगळल्या समाजमनास नवउन्मेषाची पालवी फुटते आणि सृजनाचे बीज अंकुरते! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीशिवाय, एकमताने ९२ व्या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून साहित्यिकांची पसंती आणि रसिकांचे अनुमोदन मिळालेल्या अरुणाताई ढेरे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे स्वाभाविकच होते. तुडुंब भरलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहात समाधान, आनंद, उत्साह आणि चैतन्य ओसंडून वाहिले नसते तरच नवल!

Continue reading “शुभारंभ!”

Et Cetera

#NotMe

No Human Being is entitled to choose when, where and how to take birth or exhale the last breathe; the starting and ending point of a life are decided by some other forces or elements. However what happens in between is called ‘Life’ which definitely is the series of choices one makes in the given circumstances.

Human is the only animal that, apart from being social, is gifted with an ability to think, analyze, rationalize, have opinions and voice them and all this for a greater purpose than just surviving… of transcending the basic instincts and making most of all gifted abilities to make this world a better place.

Continue reading “#NotMe”

Et Cetera

महोत्सव…!

दसरा आटोपला की तेजाच्या उत्सवाचे अर्थात दिपावळीचे वेध लागतात. दिवाळी म्हणजे वर्षभरातील सगळ्यात मोठा, उत्सवी आणि उर्जेने भरपूर असा सणोत्सव! या निमित्ताने घरदारच्या स्वच्छता, सजावटीपासून तर खरेदीची रेलचेल आणि खाण्यापिण्याची चंगळ असे उत्साही आणि उन्मेषी वातावरण आसमंतात भरून राहिलेले असते.

Continue reading “महोत्सव…!”

Et Cetera

Picture Perfect…!

If a picture is worth thousand words, an actual photograph must be worth at least hundred protests…!

The Picture featured here has saved entire process of erecting a make-shift structure with a dais and pavilion that would have harmed heavily to the environment from digging holes in earth to put an air cooling system within the covered pavilion and all this just for an hour or two! Instead, the participants of this event enjoyed the cool shade of the Tree they took the shelter of and uncharged, unlimited supply of pure ‘Oxygen’ proved to be the ‘windfall’, literally…!

Continue reading “Picture Perfect…!”

Et Cetera

Vayam…!

There is no count how many times I have used the analogy of UBUNTU – an African moral story that explains coexistence in such a simple and effective manner that is unmatched – in my Capacity Building Training sessions for any topic, in general and for Team Building, in particular. I am fascinated with the UBUNTU concept of ‘I am because we are…!’ and that’s the reason my e-paper Be[a]Cause has a tagline – ‘We have to Coexist and not compete!’

Today I want you to meet a phenomenon (calling Milind a person would be an understatement, I guess!) who is practically living UBUNTU day in and day out for about 2 decades now in the dense jungles of Jawhar. Milind Thatte, student of Political Science from Mumbai University who used to be a Journalist for Mumbai-based newspapers around the new millennium, a convenient job in the comforts of urban life that he relinquished for volunteering 3 years full-time in a non-formal education project for tribal children.

Continue reading “Vayam…!”

Et Cetera

Teacher’s Day!

Dr. Sarvepalli Radhakrishnan’s Birthday on 5th of Sept is celebrated as Teacher’s Day as this Master believed that ‘The end-product of education should be a free creative man, who can battle against historical circumstances and adversities of nature’ and hence ‘Teachers should be the best minds in the country…!’

Apart from being First Vice President, Second President of Independent India, a Statesman and Philosopher, Dr. Radhakrishnan was awarded several high awards including a Knighthood in 1931, the Bharat Ratna, the highest civilian award in India, in 1954, and honorary membership of the British Royal Order of Merit in 1963.

Continue reading “Teacher’s Day!”

Et Cetera

Simplified…!

In the changing scenario of technological developments, societal value systems, new-age concerns and their extensive implications, it has become imperative to rethink how we design the syllabus for any academic or training and based on what. Memorizing number tables and doing calculations on hand was made obsolete by invention of calculator and mobile phones easily replaced wrist watches by having digital time as a default function. Smart-Phones not only replaced entry-level Digital Cameras with a bonus (and lure) of ‘Selfie’, which you would find everywhere around you except in the dictionary!

Continue reading “Simplified…!”

Et Cetera

Independence…!

वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयजशीतलाम् शस्यशामलां मातरम्
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरम् ।। १ ।।
वन्दे मातरम् ।

Continue reading “Independence…!”

Et Cetera

गुरुपौर्णिमा

ब्रह्मा, विष्णू, महेश (उत्पत्ती, वृद्धी आणि लय) यांनी अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया (ज्ञान/कर्म/भक्ती आणि तपस्या) यांची परिक्षा घेतली आणि त्या परीक्षेस उतरल्यामुळे अनुसूयेस वर दिला असता तिने या तिघांनी आपल्या पोटी जन्म घ्यावा हा वर मागितला आणि परिणामस्वरूप या तिघांचा समन्वय असलेला त्रिगुणात्मक दत्त जन्माला आला अशी कथा आहे. ज्याच्या जन्मापासूनच अशा दैवी अधिष्ठानांची योजना आहे आणि ज्याच्या नावातच गुरु, देव आणि दत्त तीनही तत्व आहेत असा हा अलौकिक योगी भीमा-अमरजेच्या संगमास गाणगापुरी औदुंबरछायेत वस्ती करून, काशीस स्नान करतो आणि कोल्हापुरास भिक्षा मागून माहूर गडावर निजावयास जातो अशी श्रद्धा बाळगणाऱ्या त्याच्या भक्तांचे क्लेश हरण करतो आणि षडरिपुंपासून त्यांची सुटका करून मुक्तीची वाट दाखविणारा सद्गुरू भेटवून देतो अशी धारणा आहे. Continue reading “गुरुपौर्णिमा”

Et Cetera

Initiative…!

From the recent rollback on the Plastic Ban, it is evident that ‘Enacting’ or ‘Banning’ anything has a little success, if not a complete failure! Do we really need to ban anything or do we need a fundamental change in our mindset as a society…?

This story of a small town in South India shows how People with right intentions and honest initiative can bring the transformation along-with finding a place in Guinness Book of Records… an achievement that deserves applauds and faithful following!

Way to go…!

Et Cetera

Yoga…!

“Yoga is an invaluable gift of India’s ancient tradition. It embodies unity of mind and body; thought and action; restraint and fulfillment; harmony between man and nature; a holistic approach to health and well-being. It is not about exercise but to discover the sense of oneness within yourself, the world and the nature. By changing our lifestyle and creating consciousness, it can help us deal with climate change. Let us work towards adopting an International Yoga Day.”

Indian Prime Minister Narendra Modi during his address to UN General Assembly [September 27, 2014] on occasion of adoption of 21 June as International Day of Yoga.

Read the original post published on First International Yoga Day on my blog HERE.

Image source: https://yogakids.com/online-kids-yoga-training/
Et Cetera

SoP

As I am on a continuous quest to explore my SOP [Statement of Purpose], I keep working on my profile and, in the process, always find something that needs a tweak. As a result, I have generated many versions of myself and at times this question come haunting me in the nightmare – Who am I? A Marathi Poem ‘Koham‘ I have penned with the similar feeling describes it well philosophically and my well-received LinkedIn Profile has versions to describe my endeavor professionally. Following is one of the version of my LinkedIn Summary that was appreciated greatly by my network and it is needless to say that it is dear to me otherwise as well! See how it resembles to the ‘I’ that you know…? Continue reading “SoP”

Et Cetera

Whistle-blower!

Being a Social (media?) Animal, Man is seldom happy in isolation unless he is either a hermit or a fugitive. Humans have this natural urge to communicate, to express, to be heard, to be cajoled and pampered. A cliché ‘you neither can pat your own back nor can hug yourself…’ suggests that presence of other people in your life is as essential for your emotional survival as water and food for your physical survival. Like-minded people form group and share each other’s viewpoints. In a group, a person feels secure and empowered as it experiences a sense of belonging, togetherness and unanimity as well as anonymity! Social influence leads to group polarization that strengthens the opinions of each person in the group. Continue reading “Whistle-blower!”

Et Cetera

Rama – The Supreme Being!

Ramayana is not just another Epic or Mythological Legend, it is a Philosophical ideology that we can identify with in our own day-to-day life. ‘Ra’ means Light and ‘Ma’ means Inner. ‘RAMA’ means Inner Light i.e. the Guiding Soul or the Subconscious that embodies our existence. Let’s explore how the spirit of Ramayana dwells in our mortal lives… Continue reading “Rama – The Supreme Being!”

Et Cetera

The Wealth of Nations?

In the wake of recent Bank blunders that facilitated Billionaire’s safe passage to take it away from the homeland and leaving the honest hardworking taxpayers to their ill-fate the total will cross 25,000 Crore mark soon, it seems. Either it be a NPA or a LOC/U or any other type of ‘Advance’, it is sheer negligence on the parts of governing systems of these transactions and it doesn’t require special intelligence to understand that the neglectors are rewarded sufficiently in this loathsome nexus of authorities in the areas of concern. Continue reading “The Wealth of Nations?”

Et Cetera

एक मुक्त चिंतन

मनुष्य वस्ती करून राहू लागला व त्याला शेतीचा शोध लागला तेथून मानवी उत्क्रांतीच्या एका नव्या अध्यायास सुरुवात झाली. मूलभूत प्राथमिक गरजांच्या नियोजनामध्ये सुसूत्रता आली तशी अवांतर विचारांसाठी उपलब्ध झालेल्या माणसाच्या बुद्धीला नवीन क्षितिजे खुणावू लागली. पशु-पक्ष्यांहून वेगळ्या आयामाचे जगणे माणसाला साद घालू लागले. मुळातच समूहाने राहण्याची अंगभूत वृत्ती असलेला मनुष्यप्राणी, स्वतःसाठी आणि आपल्या समूहासाठी जगणे अधिक सुकर तथा सुखासीन करण्याच्या ओढीने नवनवीन प्रयोग करू लागला आणि त्या प्रायोगिकतेतून हाती आलेल्या प्रत्येक निष्कर्षाचे आपल्या समाजबांधवांसाठी उपयोजन शोधू लागला. या मार्गावर प्रगती साधत असतांना वसाहतवादाने मूळ धरले आणि त्या पाठोपाठ आलेल्या यंत्रयुगाने माणसाच्या आयुष्याची दिशा ही अंतर्मुखतेकडून बहिर्मुखतेकडे झपाटयाने वाहवत गेली. Continue reading “एक मुक्त चिंतन”

Et Cetera

Sloth…?

It’s been exactly One Month – 30 days since I shared some concerns here on the New Year Day regarding the broken system of the world in the 21st Century with the metaphor of ‘Hummingbird’ by Nobel-laureate Activist Wangari Maathai and tried to promote ‘Enoughism’ as well. Today I am sharing here an excellent video (above) that raises many questions, best being – ‘Are we Intelligent or Ignorant?’ This might just provide an impetus to the reader what s/he wants to be – a Hummingbird or a Sloth? Continue reading “Sloth…?”

Et Cetera

Count down…?

“Imagination is more important than knowledge. For knowledge is limited to all we now know and understand, while imagination embraces the entire world, and all there will ever be to know and understand. Logic will get you from A to Z. Imagination will get you everywhere” ~ Albert Einstein

Satirist, social critic, cynic or freethinker… none of it is even a normal, let alone decent, adjective, I guess; but that’s what H. L. Mencken was seen as by the American society then! This twentieth-century journalist, also known as the “Sage of Baltimore” and the “American Nietzsche”, was often regarded as one of the most influential American writers of the early 20th century, nonetheless. The then American society failed to recognize another quality of this man… being a visionary! Just look at what he said about 100 years ago and there would be no need of another proof of his ‘Vision’! Continue reading “Count down…?”

Et Cetera

Tribute…?

Prevalent from early cultural settlements, Indians have this typical trait of worshiping a person more than her/his contribution or works. This Legendary, Larger-than-life image of anybody – living or dead – makes more harm to his position than good to his passion. Reason behind this practice is easily comprehendible – it is very convenient to honor any significant personality with a title, put up her/his statue and offer a garland on his Birth and Death anniversary. This allows you to behave as you want for rest of 363 days – a fundamental right given to a Free Citizen of Independent India by the Constitution that Bharat Ratna Dr Bhimrao Ramji Ambedkar was the Principle Architect of. Continue reading “Tribute…?”

Et Cetera

Children’s day…!

A global disease burden study has revealed that in 2016, 0.9 million (About 10 Lac) children under the age of 5 died in India — the highest globally, more than some of the poorest countries in the world. The World Bank Reports says, ‘Rates of malnutrition among India’s children are almost five times more than in China and twice those in Sub-Saharan Africa. Nearly half of all India’s children – approximately 60 million (6 Cr) – are underweight, about 45% are stunted (too short for their age), 20% are wasted (too thin for their height, indicating acute malnutrition), 75% are anemic, and 57% are Vitamin A deficient.’  Continue reading “Children’s day…!”

Et Cetera

‘ये हृदयीचे ते हृदयी…’

मनुष्य हा समूहप्रिय प्राणी आहे आणि समूह म्हणजे केवळ थवा, कळप किंवा तांडा नव्हे. पशुपक्षांपेक्षा निराळी भावनिक गरज माणसाला असते ती व्यक्त होण्याची, रममाण होण्याची, तादाम्य पावण्याची आणि… सहवेदनेची! सहवेदना म्हणजे सहानुभूती नव्हे, कणव किंवा दया तर मुळीच नव्हे. मला जे वाटते, भासते, जाणवते आहे त्याचे तुला आकलन होते आहे, ‘ये हृदयीचे ते हृदयी…’ तरंग जुळता आहेत… ही सहवेदना! सहवेदना ही माणसाची केवळ गरज आणि वैशिष्ट्यच नव्हे तर ते माणसाला आणि फक्त माणसालाच, प्रकृतीने दिलेले वरदान आहे, हे आपण विसरलो तेथेच आपला परतीचा प्रवास सुरु झाला. Continue reading “‘ये हृदयीचे ते हृदयी…’”

Et Cetera

शिकविण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती…?

शिक्षण या शब्दाचा अर्थ केवळ साक्षरता किंवा परिक्षा एवढा सीमित असू शकत नाही आणि नसावा. शिक्षणाचे पहिले आणि सगळ्यात महत्वाचे उद्दिष्ट हे, एक अशी युवा पिढी घडविण्याचे असायला हवे जी अत्यंत जिज्ञासू वृत्तीने ज्ञान / कौशल्य प्राप्त करून, मिळविलेल्या ज्ञानाचे / कौशल्याचे स्वत:च्या चरितार्थाचे साधन मिळविण्यासाठी विवेक बुद्धीने उपयोजन करेल व सचोटीने स्वत:ची प्रगती साधत आपला समाज व राष्ट्र यांच्या उत्कर्षासाठी झटेल. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक हा जेवढा सजग, सक्रीय, सुसंवादी आणि सूज्ञ असेल तेवढी लोकशाही बळकट होण्यास हातभार लागू शकतो आणि पर्यायाने त्या राष्ट्राच्या उन्नतीस तो सहाय्यभूत ठरू शकतो. शिक्षणाची ही मूळ भूमिका असावयास हवी. Continue reading “शिकविण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती…?”

Et Cetera

Purpose…!

“I went to a bookstore and asked the saleswoman, ‘Where’s the self-help section?‘ She said if she told me, it would defeat the purpose.”

When Volkswagen scam was revealed, the fundamental question and concern has brought the discussion of CSR and its application on the table, particularly because of Volkswagen’s CSR Ranking! If the Corporate(s) are using the CSR as either ‘Strategic’ branding tool ONLY or to escalate the profits by hook or crook to meet the ‘En-Forced’ CSR burden, will it not defeat the purpose? Continue reading “Purpose…!”

Et Cetera

चला, पालकत्व साजरे करू या…!

पालकत्व ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे जी आधी स्वीकारावी लागते आणि मगच ‘शिकता’ येते.  शिकून सवरून पालकत्व करण्याची सोय अत्याधुनिक जगात देखील नाही याचे कारण असा कुठलाही कोर्स अथवा अभ्यासक्रम जगाच्या पाठीवर मुळी उपलब्धच नाही. तरीदेखील सजग, सटीक आणि सुजाण पालकत्व हे समाजधारणेचे सगळ्यात महत्वाचे आणि अतिशय संवेदनशील असे साधन आहे. याचे कारण म्हणजे व्यक्तींच्या समूहाने समाज बनतो, समाजाच्या एकोप्याने राष्ट्र घडते आणि राष्ट्रांच्या सहयोगातून मानवतेचे विराट दर्शन होऊ शकते. तथापि व्यक्तीच्या भाव-भावना, भान-जाणीवा, विचार-कल्पना, चिंतन-मनन, स्वभाव-वर्तन यांची जोपासना गर्भधारणेपासून सुरु होते आणि देहावसनापर्यंत निरंतर चालू असते आणि या जोपासनेमधील प्रमुख घटक असतो व्यक्तीचे कुटुंब. संस्कारक्षम वयात मुला-मुलींना ज्या वातावरणात वाढवले जाते, ज्या सभोवतालात ती श्वास घेतात आणि ज्या परस्पर वर्तणूक आणि सहसंबंधांच्या प्रेरणांचा ते अनुभव घेतात त्याची स्पंदने त्यांच्या अंतर्मनावर खोल उमटून आयुष्यभर त्यांची सोबत करतात; एवढेच नव्हे तर त्यांच्या आचार-विचारांना दिशा देतात. Continue reading “चला, पालकत्व साजरे करू या…!”